Wednesday, July 29, 2020

पाठ ३६ सुभाषिते

संस्कृत मधे शुभकामना

नमस्ते = प्रणाम
शुभकामनाः / मङ्गलकामना: = शुभकामना
मम शुभकामनाः = माझ्या शुभकामना

अनुगृहीतोऽस्मि। = आपला आभारी आहे. (पुंल्लिङ्ग )

अनुगृहीताऽस्मि।= आपली आभारी आहे (स्त्रीलिङ्ग )

उपकृतोऽस्मि।= आपला आभारी आहे. (पुल्लिंग )

उपकृताऽस्मि। = आपली आभारी आहे (स्त्रीलिङ्ग )

धन्योऽस्मि। = आपला आभारी आहे (पुंल्लिङ्ग )

धन्याऽस्मि। = आपली आभारी आहे (स्त्रीलिङ्ग)

मुदितोऽस्मि।= मला आनंद झाला. (पुंल्लिङ्ग)

मुदिताऽस्मि। = मला आनंद झाला. (स्त्रीलिङ्ग)

अभिनन्दनम्। = अभिनंदन

जन्मदिवसस्य हार्दिक्यः शुभकामनाः।
= जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसस्य कोटिश: शुभकामना:।
= जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

जन्मदिवसस्य अनेकश: शुभकामना:।
= जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा

जन्मदिवसस्य अभिनन्दनानि।
= वाढदिवसाबद्दल अभिनंदन
.
त्वं जीव शतं वर्धमान: = शंभर वर्षांचे आयुष्य लाभो. (पुंल्लिङ्ग)
जीवेत शरद: शतम् ।

त्वं शतं जीव शरदः वर्धमाना। = शंभर वर्षांचे आयुष्य लाभो. (स्त्रीलिङ्ग)

पुत्रप्राप्त्यर्थं हार्दिकानि अभिनन्दनानि।
= पुत्र प्राप्ति झाल्याबद्दल अभिनंदन ।

पुत्रस्य जन्मनः हार्दिकानि अभिनन्दनानि।
= पुत्राच्या जन्माबद्दल  हार्दिक अभिनंदन.

पुत्रीप्राप्त्यर्थं हार्दिकानि अभिनन्दनानि।
= मुलीच्या जन्माबद्दल  हार्दिक अभिनंदन.

पुत्र्या: जन्मन: हार्दिकानि अभिनन्दनानि।
= पुत्री के जन्म की हार्दिक बधाईयाँ।

शुभविवाहार्थम् अभिनन्दनानि।
= शुभ विवाह बद्दल अभिनंदन
.
विवाहस्य वर्धापनदिनस्य अभिनन्दनानि।
= लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

यशसा वर्धते भवान् ।
= आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन

पदोन्नत्यर्थं शुभकामनाः / अभिनन्दनानि।
= बढती मिळाल्याबद्दल अभिनंदन

समारोहस्य कृते हार्दाः शुभाशयाः।
= समारंभासाठी हार्दिक शुभाकामना

युवयोः वैवाहिकजीवनं सर्वदा शुभम् भवतु।
= आपले वैवाहिक जीवन मंगलदायक होवो.

नवदम्पत्योः वैवाहिकजीवनं सुखमयं भवतु।
= नवदम्पति चे वैवाहिक जीवन सुखमय होवो.

शिवास्ते पन्थानः सन्तु । = आपला प्रवास सुखकर होवो.

शीघ्रमेव स्वस्थः भवतु = आपण लवकर बरे व्हा.

१) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥५२-३॥

संधिविग्रह - गुरु: ब्रह्मा गुरु: विष्णु: गुरु: देव: महेश्वर: गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ।

अर्थ - गुरूच ब्रह्मदेव आहे, गुरूच विष्णू आहे व गुरूच शंकर आहे. गुरूच साक्षात परब्रह्म आहे अशा गुरूंना नमस्कार असो.

२) या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम: ॥७६-११॥

संधिविग्रह - नम: तस्यै

अर्थ - जी देवी सर्व प्राणिमात्रांमधे बु्द्धीरूपाने राहिली आहे तिला त्रिवार नमस्कार असो.

३) चन्द्राननार्धदेहाय चन्द्रांशुसितमूर्तये । चन्द्रार्कानलनेत्राय चन्द्रार्धशिरसे नम: ॥७७-३॥

अर्थ - चंद्रासारखे मुख असणारी पार्वती ही ज्याचे अर्धे अंग आहे, चंद्राच्या किरणांप्रमाणे ज्याचे शरीर श्वेत वर्णाचे आहे, चंद्र, सूर्य व अग्नी यांच्या प्रमाणे ज्याचे तेजस्वी नेत्र आहेत व ज्याने अर्धा चंद्र डोक्यावर धारण केला आहे, अशा त्या शंकराला नमस्कार असो.

४) अपारे काव्यसंसारे कविरेक: प्रजापति: । यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते ॥११-१७॥

संधिविग्रह - कवि एक:, यथा अस्मै

अर्थ - अथांग अशा या काव्यरूपी विश्वामधे कवी हाच ब्रह्मदेव आहे. (कारण) त्याला हे काव्यविश्व जसे आवडते तसे ते तो बदलतो.

५) दारिद्र्यान्मराणाद्वा मरणं मे रोचते न दारिद्र्यम् । अल्प्क्लेशमरणं दारिद्र्यमनन्तकं दु:खम् ॥१५-५॥

अर्थ - दारिद्र्य व मरण यांच्यामधे मला मरण आवडते, दारिद्र्य नाही. कारण मरणामधे थोडेच क्लेश असतात तर दारिद्र्यात दु:ख अनंत असते.

६) अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥५७-१॥

संधिविग्रह - जन्मभूमि: च

अन्वय - हे लक्ष्मण, स्वर्णमयी अपि लङ्का मे न रोचते । जननी जन्मभूमि: च स्वर्गादपि गरीयसी ।

अर्थ - हे लक्ष्मणा लंका सोन्याची असली तरी ती मला आवडत नाही. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.

७) अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारम् । सद्भ्यो न रोचते साऽसन्तोऽप्यस्यै न रोचन्ते ॥५-१६॥

संधिविग्रह - अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारम् ।
सद्भ्य: न रोचते सा असन्त: अपि अस्यै न रोचन्ते

अन्वय -  स्तुतिकन्या अद्यापि दुर्निवारं कौमारम् वहति ।
(यत:) सद्भ्य: सा न रोचते, असन्त: अपि अस्यै न रोचन्ते

अर्थ - स्तुतीरूपी कन्या अजूनही निवारण करण्यास कठिण असे तारुण्य वहात आहे. (अजूनही ती कुमारिकाच आहे.) कारण संतांना ती आवडत नाही व तिला दुर्जन आवडत नाहीत. 
 
 
 
span style="color: blue;"> " सुभाषिते " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

पाठ ३५ (चतुर्थी विभक्ती भाग २)

काही अव्ययांना सुद्धा चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते.
नम: = नमस्कार असो = श्रीगणेशाय नम: ।
स्वस्ति = कल्याण असो = नृपाय स्वस्ति ।
स्वाहा = अर्पण असो = अग्नये स्वाहा ।
स्वधा = अर्पण असो = पितृभ्य: स्वधा ।
अलम् = पुरेसा आहे = राम: रावणाय अलम् ।

आता एक पाठ पाहूया.
        शारदा
हे शारदे, तुभ्यं नम: । तव मुखं पूर्णचन्द्रमिव । मुक्ताहार: इव त्वं गौरवर्णा । तव एकस्मिन् हस्ते शोभना वीणा शोभते एकस्मिन् हस्ते पुस्तकं विराजते । श्वेतं पद्मं तव आसनम् । मयूर: तव वाहनम् । तस्य पृष्ठे त्वं उपविशसि । 

त्वं विद्याया: देवता । त्वं ज्ञानदायिनी खलु । त्वं सर्वेषां जाड्यम् अपहरसि । त्वं सर्वेभ्य: ज्ञानं यच्छसि ।
अत: अहं विद्यारम्भे त्वां नमामि । तव प्रसादेन मनुष्य: पाण्डित्यं लभते । तव प्रसादेन कवि: काव्यमपि करोति । त्वं सर्वेषु प्राणिमात्रेषु बुद्धिरूपेण वससि । ब्रह्मदेव: विष्णु: शङ्कर: अपि त्वां नमन्ति । अहमपि त्वां शरणम् आगच्छामि । हे शारदे, मह्यं विद्यां यच्छ । मम अज्ञान हर ।

प्रश्न १) उत्तराणि लिखत -
प्रश्न १) शारदाया: मुखम् कीदृशम् ?
प्रश्न २) शारदाया: हस्ते किं शोभते ?
प्रश्न ३) शारदाया: किं आसनम् ?
प्रश्न ४) मयूर: कस्य वाहनम् ?
प्रश्न ५) का विद्याया: देवता ?
प्रश्न ६) शारदा किं किं करोति ?
प्रश्न ७) मनुश्ःय: कदा पाण्डित्यं लभते ?
प्रश्न ८) शारदा सर्वप्राणिमात्रेषु केन रूपेण वसति ?*
प्रश्न ९) शारदां के के नमन्ति ?
प्रश्न १०) लेखक: शारदां किं वदति ?


प्रश्न २ रा अ गटातील नामे व ब गटातील विशेषणे यांच्या जोड्या लावा.
अ गट - छात्रा:, वानर:,  वनानि, मार्गा:, मयूर:, चरणौ, नृत्यम्, गरुडा:, मेघ:, खड्गम्

ब गट - नयनमनोहरम्, तीक्ष्णम्, खगा:, दीर्घा:, पुष्कला:, राष्ट्रखग:, असुन्दरौ, विशालानि, चपल:, कृष्ण: 
 
 ३५ वा पाठ उत्तरे.

शारदा भाषांतर

    हे शारदे, तुला नमस्कार असो. तुझं मुख पूर्ण चंद्राप्रमाणे आहे. मोत्यांच्या माळेप्रमाणे तुझा रंग गौर आहे. तुझ्या एका हातात वीणा शोभते तर एका हातात पुस्तक शोभते. श्वेत रंगाचे कमळ तुझे आसन आहे. मोर तुझे वाहन आहे. त्याच्या पाठीवर तू बसतेस. हंस सुद्धा तुझे वाहन आहे. म्हणून लोक तुला हंसवाहिनी असे म्हणतात.

    तू विद्येची देवता आहेस. तू खरोखरच ज्ञान देणारी आहेस. तू सर्वांच्या बुद्धीचे मांद्य घालवतेस. तू सर्वांना ज्ञान देतेस.
    
    म्हणून विद्येच्या आरंभी मी तुला नमन करतो. तुझ्या कृपेमुळे मनुष्य पांडित्य प्राप्त करतो. तुझ्या कृपेमुळे कवी काव्य सुद्धा करतो. तू सर्वच प्राणिमात्रंमधे बुद्धीच्या रूपाने रहात आहेस. ब्रह्मदेव, शंकर, विष्णू सुद्धा तुला नमन करतात. मी सुद्धा तुला शरण आलो आहे., हे शारदे, मला विद्या दे. माझे अज्ञान नाहीसे कर.



प्रश्न १) उत्तराणि लिखत -
प्रश्न १) शारदाया: मुखम् कीदृशम् ?
शारदाया: मुखं पूर्णचन्द्रमिव ।

प्रश्न २) शारदाया: हस्ते किं शोभते ?
शारदाया: एकस्मिन् हस्ते शोभना वीणा शोभते एकस्मिन् हस्ते पुस्तकं विराजते ।

प्रश्न ३) शारदाया: किं आसनम् ?
श्वेतं पद्मं शारदाया: आसनम् ।

प्रश्न ४) मयूर: कस्य वाहनम् ?
मयूर: शारदाया: वाहनम् ।

प्रश्न ५) का विद्याया: देवता ?
शारदा विद्याया: देवता ।

प्रश्न ६) शारदा किं किं करोति ?
शारदा सर्वेभ्य: ज्ञानं यच्छति, सर्वेषां जाड्यं अपहरति ।

प्रश्न ७) मनुष्य: कदा पाण्डित्यं लभते ?
शारदाया: प्रसादेव मनुष्य: पाण्डित्यं लभते ।

प्रश्न ८) शारदा सर्वप्राणिमात्रेषु केन रूपेण वसति ?*
शारदा सर्वेषु प्राणिमात्रेषु बुद्धिरूपेण वससि ।

प्रश्न ९) शारदां के के नमन्ति ?
ब्रह्मदेव: विष्णु: शङ्कर: अपि शारदां नमन्ति ।

प्रश्न १०) लेखक: शारदां किं वदति ?
 लेखक: शारदां वदति, “हे शारदे, मह्यं विद्यां यच्छ । मम अज्ञान हर ।”

प्रश्न २ रा अ गटातील नामे व ब गटातील विशेषणे यांच्या जोड्या लावा.
अ गट - छात्रा:, वानर:,  वनानि, मार्गा:, मयूर:, चरणौ, नृत्यम्, गरुडा:, मेघ:, खड्गम्

ब गट - नयनमनोहरम्, तीक्ष्णम्, खगा:, दीर्घा:, पुष्कला:, राष्ट्रखग:, असुन्दरौ, विशालानि, चपल:, कृष्ण:

छात्रा: - पुष्कला:
वानर: -  चपल:
वनानि - विशालानि
मार्गा:  - दीर्घा:
मयूर: - राष्ट्रखग:
चरणौ - असुन्दरौ
नृत्यम् - नयनमनोहरम्
गरुडा: - पुष्कला:
मेघ: - चपल:
खड्गम् - तीक्ष्णम् 
 





span style="color: blue;"> " चतुर्थी विभक्ती भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, July 28, 2020

पाठ ३४ सुभाषिते (चतुर्थी विभक्ती) व चौथ्या गणाचे धातू

जसे संप्रदान कारकाची चतुर्थी विभक्ती होते, त्याप्रमाणेच ज्या हेतूने क्रिया केली जाते त्याची सुद्धा चतुर्थी होते. थोडक्यात मराठीत आपण ज्याला साठी हा प्रत्यय लावतो त्या शब्दासाठी संस्कृतमधे चतुर्थी विभक्ती योजतात.

१) दानाय लक्ष्मी: सुकृताय विद्या चिन्ता परेषां सुखवर्धनाय ।
  परावबोधाय वचांसि यस्य धन्यस्त्रिलोकितिलक: स एव ॥

संधिविग्रह - दानाय लक्ष्मी: सुकृताय विद्या चिन्ता परेषां सुखवर्धनाय ।
   परावबोधाय वचांसि यस्य धन्य: त्रिलोकितिलक: स: एव ॥

अन्वय - यस्य लक्ष्मी: दानाय, (यस्य) विद्या सुकृताय, (यस्य) चिन्ता परेषां सुखवर्धनाय, (यस्य) वचांसि परावबोधाय, स: त्रिलोकितिलक: धन्य: एव ।

अर्थ - ज्याची संपत्ती ही दानासाठी, विद्या पुण्यकर्म करण्यासाठी व विचार नेहेमी दुसर्‍याचे सुख वाढवण्याविषयी असतो, ज्याची वचने नेहेमी दुसर्‍याला ज्ञान देण्यासाठी असतात तो त्रैलोक्याला ललामभूत असणारा मनुष्य धन्य आहे.

२) विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ति: परपीडनाय ।
साधोस्तु सर्वं विपरीतमेतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥५-४॥

संधिविग्रह - विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ति: परपीडनाय । साधो: तु सर्वं विपरीतम् एतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय

अन्वय - खलस्य विद्या विवादाय, (खलस्य) धनं मदाय; (खलस्य) शक्ति: परपीडनाय (अस्ति) । साधो: तु सर्वं एतद् विपरीतम् । (साधो: विद्या) ज्ञानाय, (साधो: धनं) दानाय च (साधो: शक्ति:) रक्षणाय (अस्ति) ।

अर्थ - दुष्ट मनुष्याची विद्या ही भांडणासाठी असते, त्याचे धन हे गर्विष्ठ होण्यासाठी असते तर त्याचे बल हे दुसर्‍यांना त्रास देण्यासाठी असते, सज्जनांचे मात्र त्याच्या विरुद्ध असते. त्याची विद्या ही ज्ञानासाठी, धन हे दानासाठी व शक्ती ही दुसर्‍याचे रक्षण करण्यासाठी असते.

३) संक्षेपात् कथ्यते धर्मो जना: किं विस्तरेण वा ।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् ॥

संधिविग्रह - संक्षेपात् कथ्यते धर्म: जना: किं विस्तरेण वा । परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् ॥

अन्वय - जना:, संक्षेपात् धर्म: कथ्यते । विस्तरेण किं वा । परोपकार: पुण्याय (भवति) परपीडनम् पापाय  (भवति) ।

अर्थ - हे लोकहो, संक्षेपात धर्माचे सार सांगतो. उगाच विस्तार करून काय उपयोग ? परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो तर परपीडा पापाला कारणीभूत होते.

४) कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति । अस्पृशन्नेव वित्तानि य: परेभ्य: प्रयच्छति ॥१२-१॥

संधिविग्रह - कृपणेन सम: दाता न भूत: न भविष्यति । अस्पृशन् एव वित्तानि य: परेभ्य: प्रयच्छति

अन्वय - कृपणेन सम: दाता न भूत: न भविष्यति । य: अस्पृशन् एव वित्तानि परेभ्य: प्रयच्छति ।

अर्थ - कंजूष मनुष्यासारखा दानी मनुष्य पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही. कारण तो धनाला स्पर्श न करताच ते धन तो दुसर्‍याला देतो



आता चौथ्यागणाचे धातू पाहूया.

आपण पाहिलं की संस्कृतमधे परस्मैपद व आत्मनेपद या दोन गटात धातू विभागलेले आहेत. त्या गटांमधे सुद्धा १, ४, ६ व १० या धातूंची विकरणे अकारान्त असल्यामुळे धातूंची रूपे जवळपास सारखी होतात. म्हणून या चार गणांचा एक गट पडतो व उरलेले गण दुसर्‍या गटात पडतात. सध्या आपण याच चार गणातील रूपे कशी होतात ते पहाणार आहोत.

पहिल्या गणाचे  परस्मैपदी व आत्मनेपदी धातू आपण पाहिले. आता चौथ्या गणातील धातू पाहूया. चौथ्या गणाचे विकरण आहे ‘य’. त्यामुळे धातूला प्रत्यय लावतांना प्रथम ‘य’ हे विकरण लावायचे व मग त्याला क्रियापदांचे प्रत्यय लावायचे.
उदा. नृत् (४ प. प.) = नाचणे. हा धातू चौथ्या गणाचा आहे. म्हणून नृत् + य = नृत्य हे धातूचे अंग तयार झाले. आता त्याच्या पुढे क्रियापदाचे परस्मैपदी प्रत्यय येतील.

नृत्यामि  नृत्याव:  नृत्याम:  प्रथम पुरुष.
नृत्यसि  नृत्यथ:  नृत्यथ  द्वितीय पुरुष.
नृत्यति  नृत्यत:  नृत्यन्ति  तृतीय पुरुष.

आता इथे प्रथम गण व चतुर्थ गणातील धातू स्पष्टपणे ओळखता येतो.
नमामि नृत्यामि. चौथ्या गणातील धातूंमधे य हे विकरणाचे अक्षर स्पष्टपणे क्रियापदामधे दिसते.

चौथ्या गणाचे धातू आत्मनेपदी असतील तर त्या धातूला य हे विकरण लागून पुढे आत्मनेपदी प्रत्यय लागतील.
उदा. युध् (४ आ. प.) = युद्ध करणे
युध् + य् (हे विकरण) = युध्य हे झाले धातूचे अंग. आता यापुढे आत्मनेपदी प्रत्यय येतील.

युध्ये  युध्यावहे  युध्यामहे
युध्यसे  युध्येथे  युध्यध्वे
युध्यते  युध्येते  युध्यन्ते 



span style="color: blue;"> " सुभाषिते (चतुर्थी विभक्ती) व चौथ्या गणाचे धातू " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, July 27, 2020

पाठ ३३ आत्मनेपदी वर्तमानकाळ व चतुर्थी विभक्ती

मागच्या २९ व्या पाठात आपण आत्मनेपदी धातू कसे चालतात ते पाहिले. परस्मैपदाप्रमाणेच आत्मनेपदी धातूंची सुद्धा प्रत्येक काळात तीन पुरुषांची व तीन वचनांची मिळून ९ / ९ रूपे तयार होतील.

परस्मैपदाप्रमाणेच प्रथम पुरुषी कर्त्यापुढे प्रथमपुरुषी क्रियापदे, द्वितीय पुरुषी कर्त्यांपुढे द्वितीय पुरुषी क्रियापदे व तृतीय पुरुषी कर्त्यांपुढे तृतीय पुरुषी क्रियापदे येतील. ह्या गोष्टी दोन्हीकडे म्हणजे परस्मैपद व आत्मनेपद यांच्याकडे सारख्यच आहेत.

इ वहे महे
से इथे ध्वे
ते इते अन्ते

वन्दे   वन्दावहे  वन्दामहे  प्रथम पुरुष
वन्दसे  वन्देथे   वन्दध्वे   द्वितीय पुरुष
वन्दते  वन्देते   वन्दन्ते    तृतीय पुरुष

अहं वन्दे । मी नमस्कार करतो.
आवां वन्दावहे । आम्ही दोघे नमस्कार करतो.
वयं वन्दामहे । आम्ही सर्व नमस्कार करतो.

त्वं वन्दसे । तू नमस्कार करतोस.
युवां वन्देथे । तुम्ही दोघे नमस्कार करता.
यूयं वन्दध्वे । तुम्ही सर्व नमस्कार करता.

स: वन्दते । तो नमस्कार करतो
तौ वन्देते । ते दोघे नमस्कार करतात.
ते वन्दन्ते । ते सर्व नमस्कार करतात.

कर्ता ज्या पुरुषाचा व वचनाचा असेल त्याप्रमाणे क्रियापदाचे पुरुष व वचन योजावयाचे असते. हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे.

वाक्यात संप्रदान कारकाची चतुर्थी विभक्ती वापरावयाची असते. एखादा मनुष्य एखादी दान देऊन ज्याला संतुष्ट करू इच्छितो तेव्हा घेणारा संप्रदान ठरतो व घेणार्‍याची चतुर्थी विभक्ती योजावयाची असते. संप्रदान शब्दाचा अर्थ आहे चांगले दान. अर्थात द्यावयाची गोष्ट ही नेहेमी करता दिलेली असते. दान दात्याकडे पुन्हा परत येत नाही.

उदा. नृप: दीनाय वस्त्रं यच्छति ।
राजा गरीबाला वस्त्र देतो.

    आपण धोब्याला कपडे देतो, पण ते दान देण्याच्या इच्छेने देत नाही तर ते धुवून परत घ्यायचे असतात. अशावेळी धोबी संप्रदान ठरत नाही. तेव्हा ‘स: रजकस्य वस्त्राणि यच्छति’ इथे धोब्याला (रजक) दिलेले कपडे देणारा परत घेणार असतो म्हणून येथे रजक संप्रदान ठरत नाही म्हणून त्या शब्दाची षष्ठी विभक्ती वापरलेली आहे.


आता आपण एक पाठ बघूया.

            सुमन्त्रस्य चातुर्यम् ।

    एकदा निशायां बाल: श्रीराम: आकाशे चन्द्रं प्रेक्षते । स: कौसल्यां भणति, “अम्ब, मह्यं एतं चन्द्रं यच्छ । अहं तम् अभिलषामि ।” तदा कौसल्या वदति, “वत्स श्रीराम, एष: चन्द्र: गगने वर्तते । त्वं कथं तम् अधिगच्छसि ?” इति । तत: बाल: श्रीराम:, ‘अहम् एनम् चन्द्रम् अभिलषामि । प्रयच्छ तं मे’ इति कौसल्यां पुन: पुन: भाषते क्रन्दति च । तदा सारथि: सुमन्त्र: तत्र आगच्छति । स: श्रीरामाय दर्पणम् एकम् यच्छति भाषते च, “बाल श्रीराम, एष: तव हस्ते चन्द्र: । पश्य एनम्” इति । तदा बाल: श्रीराम: दर्पणे चन्द्रं पश्यति आनन्दति च । तत्क्षणं स: रोदनात् विरमति ।

कठिण शब्दांचे अर्थ -
प्रेक्षते = प्रेक्ष् (१ आ. प.) = पहाणे
भणति = भण् (१ प. प.) बोलणे
यच्छ = दा-यच्छ् (१ प. प.) आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. = दे
भणति = भण् (१ प. प.) = बोलणे
वर्तते = वृत्-वर्त् (१ आ. प.) = असणे
अभिलषामि = अभि + लष् (१ प. प.) इच्छिणे
मे  = अस्मद् (सर्व. सर्वलिंगी समान) च. ए. व. = मला
वदति = वद् (१ प. प.) बोलणे
क्रन्दति = क्रन्द् (१ प. प.) रडणे
आगच्छति = आ + गम्-गच्छ् (१ प. प.) येणे
भाषते = भाष् (१ आ. प.) = बोलणे

स्वाधाय

प्रश्न १ ला - पाठाचे भाषांतर करा.

प्रश्न २ रा उत्तराणि लिखत -

प्रश्न १ - बाल: श्रीराम: आकाशे किं प्रेक्षते
प्रश्न २ -राम: कौसल्यां किं भाषते ?
प्रश्न ३ - बाल: श्रीराम: जननीं पुन: पुन: किं वदति ?
प्रश्न ४ - सुमन्त्र: किं करोति ?
प्रश्न ५ - बाल: श्रीराम: चन्द्रं कुत्र पश्यति ?

* प्रश्न ३ रा मेलनं कुरुत ।*
अ गट) - बाल:, आकाशे, एकम्
ब गट) - कृष्णवर्णे, दर्पणम् श्रीराम:

प्रश्न ४ रा - कंसातील शब्दाची योग्य ती विभक्ती वापरा.
१) श्रीराम: आकाशे ----- पश्यति । (तारका)
२) कौसल्या ----- वदति । (राधिका)
३) राम: ----- क्रीडति । (कन्दुक)
४) नृपा: ----- भवन्ति । (शूर)
५) मन्दार: ---- हस्तेन लिखति । (दक्षिण)

प्रश्न ५ था - कंसातील सूचनांनुसार बदल करा.
१) ----- पुस्तकं अधिगच्छामि । (योग्य कर्ता घाला)
२) श्रीराम: चन्द्रं पश्यति । (दृश्-पश्य् धातूऐवजी ईक्ष् धातू वापरा)
३) बालका: भणन्ति । (वाक्य एकवचनी करा)
४) खग: वृक्षे उपविशति । (वाक्य द्विवचनी करा).
५) वायस: (कावळा) डयते । (वाक्य बहुवचनी करा). 


span style="color: blue;"> " आत्मनेपदी वर्तमानकाळ व चतुर्थी विभक्ती " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Friday, July 24, 2020

संस्कृत साहित्याची ओळख ६ - संस्कृत साहित्यातील वाङ्मयप्रकार

संस्कृतमधे कोणत्याही प्रकारची वाङ्मयनिर्मिती केली असली तरी त्याला काव्य असे म्हणतात. मराठीमधे आपण काव्य ही संज्ञा फक्त पद्य वाङ्मयाला लावतो. संस्कृतमधे सगळ्यालाच काव्य म्हटले जाते. मग इंद्रियग्राह्यतेच्या आधारावर याचे दोन प्रकार होतात. १) श्रव्य काव्य व २) दृश्य काव्य. श्रव्य काव्य म्हणजे फक्त त्या काव्याचा आनंद ऐकून घेतला जातो. व दृश्य काव्य म्हणजे त्या काव्याचा आनंद श्रवणाबरोबर डोळ्यांनी पाहूनही घेता येतो. त्यामुळे दृश्यकाव्यात नाटक हा प्रकार येतो. मनुष्य प्रत्यक्ष डोळ्यांनी ते काव्य डोळ्यासमोर घडतांना पहातो. आता त्यात सिनेमाचीही भर पडली आहे. पण पूर्वी फक्त नाटक हेच दृश्यकाव्य म्हणून ओळखले जात असे. आता या नाटकाचे दहा प्रकार होते म्हणून त्याला दशरूपक असेही म्हणतात. हा भाग आपण नंतर पाहू. प्रथम पाहूया ते श्रव्य काव्य.

श्रव्य काव्याचे पुन्हा गद्य व पद्य या आधारावर गद्य काव्य व पद्य काव्य असे प्रकार होतात. संस्कृत साहित्यकारांनी आणखी एक शैली विकसित केली होती. ती म्हणजे गद्य व पद्य मिश्रित काव्य. थोडं गद्यात लिहाय़चं थोडं पद्यात लिहायच. अशा प्रकारच्या काव्यांना चंपूकाव्य असे म्हणतात.

गद्यकाव्य -

 संस्कृतमधे गद्य काव्य पद्यकाव्यापेक्षा तसे कमी प्रमाणात आहे. परंतु सुबंधूने वासवदत्ता नावाचे गद्यकाव्य रचले. त्याचे कथानक वासवदत्ता व उदयन यांच्या प्रसिद्ध कथानकाशी संबंधित नाही. त्याच्या ह्या ग्रंथातील वासवदत्तेचा उल्लेख कोणत्याही पूर्वीच्या कथानकात मिळत नाहीच पण नंतर सुद्धा त्याच्या कथानकावर आणखी काही रचना केलेल्या आढळत नाहीत.

दंडी या कवीचे दशकुमारचरित प्रसिद्ध आहे. त्यात मगध देशातील पुष्पपुरी मधे राज्य करणार्‍या राजहंस राजाला त्याचा मुलगा, त्याच्या मंत्र्यांची मुले व कुणीकुणी दिलेली मुले अशा दहा कुमारांच्या बद्दलचे कथानक गुंफलेले आहे.  दहा मुले प्राप्त झाली. त्यांचे कथानक वर्णन केलेले आहे

बाणभट्टाची कादंबरी हे गद्यकाव्य प्रसिद्ध आहे. त्यात तीन तीन जन्मांचे कथानक गुंफलेले आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या कथांची साद्यंत मांडणी करणार्‍या वाङ्मयप्रकाराला मराठीत कादंबरी हे नाव रूढ झाले.

नंतरही काही गद्यग्रंथ लिहिले गेले, पण संस्कृत साहित्यात हे तीन गद्यग्रंथ प्रसिद्ध आहेत.

पद्यकाव्य -

पद्य काव्याचे सुद्धा पुन्हा महाकाव्य, खंडकाव्य, शतककाव्य, सुभाषितकाव्य, संदेशकाव्य, स्तोत्रकाव्य, कथाकाव्य असे त्याच्या स्वरूपावरून प्रकार पडतात.

महाकाव्याचे स्वरूप त्याच्या नावावरूनच कळते. हे खूप मोठे काव्य असते. रामायण व महाभरत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन संस्कृतमधे अनेक महाकाव्ये रचली गेली. त्यातील पंचमहाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कालिदासाची दोन रघुवंशम् व कुमारसम्भवम्. यातील रघुवंशामधे रामाच्या पूर्वीचे व नंतरचे जे राजे होऊन गेले त्यांचे वर्णन आहे. तर कुमारसंभवम् मधे शंकर-पार्वतीचा पुत्र षडानन याने देवासुर संग्रामात देवांना विजय मिळावून दिला ते कथानक गुंफलेले आहे. तिसरे काव्य आहे भारवी या कवीचे किरातार्जुनीयम्. यात अर्जुन अस्त्रप्राप्तीसाठी इंद्रकील पर्वतावर तपस्या करत असतांना त्याला किराताच्या वेषातील शंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्याला पाशुपतास्त्र दिले त्यावर कथानक गुंफलेले आहे. चौथ महाकाव्य आहे माघाचे शिशुपालवधम्. यात श्रीकृष्णांनी केलेल्या शिशुपालवधाचे वर्णन केलेले आहे. तर पाचवे महाकाव्य आहे श्रीहर्षाचे नैषधीयचरितम्. यात निषध देशाचा राजा नल व दमयंती याचे कथानक आहे. इतरही अनेक महाकाव्ये आहेत. पण या पाच काव्यांना पंचमहाकाव्यांचा मान मिळालेला आहे. त्याशिवाय अश्वघोषाचे सौन्दरानन्द, बुद्धचरित, भट्टीचे भट्टिकाव्य. त्याव्यतिरिक्तही १९ व्या शतकापर्यंत अनेक महाकाव्ये संस्कृतमधे रचली गेली.

चम्पूकाव्य

संस्कृत कवींनी विकसित केलेली ही काव्याची एक अभिनव शैली. वर्ण्य विषयाचे प्रतिपादन गद्यभाषेत केलेले असते आणि ते अधिक आकर्षक करण्याकरता पद्यमय भाषेचा उपयोग केलेला असतो. गद्यामधे जे सांगितले असते तेच पुन्हा पद्यात संक्षिप्तपणे सांगितलेले असते.

    ही काव्यशैली इ. स. सनाच्या पहिल्या शतकापूर्वीच विकसित झालेली होती. चंपूकाव्य सुद्धा संस्कृतमधे बरीच उपलब्ध आहेत. नलचंपू, यशस्तिलकचम्पू, रामायणचम्पू, भागवतचंपू, उदयनसुंदरी कथा, विश्वगुणादर्शचंपू अशी बरीच चंपूकाव्य उपलब्ध आहेत.

ऐतिहासिक काव्य -

भारतीय साहित्यात इतिहास विषयाचे महत्व स्वीकारलेले होते. पुराणे व इतिहास यांना वेदांच्या बरोबरीने स्थान देण्यात आले होते. पण तरीही संस्कृत साहित्यात ऐतिहासिक काव्य नगण्य आहेत. कवींनी रामकृष्णादि ऐतिहासिक पात्रांचे खूप वर्णन केले, पण समकालीन राजांचे वर्णन मात्र अभावानेच केले. ज्या कवींना राजाश्रय मिळाला होता त्यांनी आपल्या आश्रयदात्या राजांचे अतिरंजित रूपात वर्णन केले आहे. राजतरंगिणी नावाचा एक काश्मीरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणारा ग्रंथ आहे. त्यात अतिशयोक्तीपूर्ण वर्णने असल्यामुळे ऐतिहासिक तथ्य शोधावी लागतात. संस्कृत साहित्यात थोडीफार ऐतिहासिक सामुग्री मिळते ती दानपत्र, शिलालेख, ताम्रपट यातूनच मिळते. काटेकोर इतिहासलेखन मात्र संस्कृतसाहित्यात केलेले दिसत नाही. तसं पाहिलं तर इतिहासलेखन हा आपला पिंडच नाही असे म्हणावे लागते.

रामायण व महाभारत हे मूलत: इतिहासग्रंथच आहेत.

कथाकाव्य -

संस्कृत साहित्यात कथासाहित्य मात्र खूप प्रमाणात उपलब्ध आहे. कथासाहित्याची बीजे आपल्याला वैदिक साहित्यात दिसून येतात. वेदांमधे काही संवादसूक्ते आलेली आहेत. नंतर उपनिषदांमधे अनेक छोट्यामोठ्या कथा सांगितलेल्या आहेत. अर्थात अध्यात्म-चिंतन हा उपनिषदातील कथासाहित्याचा उद्देश आहे. पुराणांनी कथासाहित्य अधिक लोकव्यापी बनवले.

    पशुपक्षांवर मानवी भावनांचे आरोपण करून सुंदर ढंगात नीतिकथा सांगितलेल्या आहेत. त्यात पंचतंत्र, हितोपदेश यांचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. गुणाढ्याने कथासरित्सागर नावाचा मोठा कथाग्रंथ मूळ पैशाची भाषेत लिहिला होता. त्याची तीन संस्कृत संस्करणे उपलब्ध आहेत. कथासरित्सागर, बृहत्कथा, बृहत्कथामंजरी. विक्रमादित्य राजाशी संबंधित सिंहासद्वात्रिंशिका हा एक कथासंग्रह प्रसिद्ध आहे. मराठीत त्याचे सिंहासनबत्तीशी नावाने भाषांतर झाले होते.

सुभाषितकाव्य
   
    सुभाषितकाव्य संस्कृत साहित्यात शीर्षस्थानी मानावे लागेल. सुभाषितकाव्ये लोकप्रिय झालेली आहेत. काही कवींनी सुभाषित शतके रचलेली आहेत. त्यात भर्तृहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कवींच्या काव्यात आलेली सुभाषिते एकत्र करून सुभाषितसंग्रह प्रसिद्ध केलेले आहेत. महाभारत तर सुभाषितांचा खाजिनाच आहे. ग्रंथरूपात उपलब्ध असणारे पहिले सुभाषित काव्य म्हणाजे गाथा सप्तशती. आर्यासप्तशती, सूक्तिमुक्तावली, सुभाषितसुधानिधी, शार्ङ्गधरपद्धती, सुभाषितावली असे अनेक सुभाषित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

खंडकाव्य म्हणजे एखाद्या विषयाला धरून केलेले छोटेखानी काव्य. उदा. महाकवी कालिदासाची ऋतुसंहार व मेघदूत ही दोन खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत.

शास्त्रीयग्रंथ - शास्त्रीय शब्दात शास् असा धातू आहे. त्याचा अर्थ आहे शासन करणे, सत्ता चालवणे. गणितशास्त्र, गण् म्हणजे मोजणे, तेव्हा मोजणे या सदराखाली जे जे येईल ते सर्व गणितशास्त्रात मोडेल. खागोल. ख म्हणजे आकाश. आकाशाच्या गोलाविषयीची सर्व प्रकारची माहिती ही खगोल शास्त्रात येईल.

संस्कृतमधे धर्मवाङ्मय खूप प्रमाणात आहे. मग संस्कृतमधे शास्त्रीय ग्रंथ आहेत की नाहीत ? अशी शंका येईल. पण संस्कृतमधे शास्त्रीय ग्रंथ पण आहेत. प्रामुख्याने आयुर्वेदशास्त्राविषयी खूप ग्रंथ उपलब्ध आहेत व पुष्कळ हस्तलिखीते अजूनही धूळ खात पडून आहेत. आयुर्वेद म्हणजे आयुष्याचे ज्ञान. चरक, सुश्रुत, वाग्भट हे श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य होऊन गेले. त्यांचे संहिताग्रंथ उपलब्ध आहेत. कायचिकित्सा, शल्यविकित्सा, कौमारभृत्यचिकित्सा, विविध विषांवर औषधोपचार सांगणारे अगदतंत्र, दीर्घायुष्यासाठी रसायनतंत्र वगैरे आयुर्वेदाच्या शाखा आहेत. 

गणितशास्त्र - गणिताचा व खगोलशास्त्राचा उगम हा यज्ञसंस्कृतीत झाला. यज्ञ करण्यासाठी ठराविक आकाराची यज्ञकुंडे आवश्यक असत. तसेच यज्ञ करण्यास ठराविक ग्रहांची पण अपेक्षा असे. त्यामुळे आकाश दर्शन व गणित वेदकालापासून चालत आलेले आहे.
गणितावरचा बाराव्या शतकात होऊन गेलेल्या भास्कराचार्यांचा लीलावती हा पद्य ग्रंथ उपलब्ध आहे. त्यात त्यांनी लीलावती ही एक लहान मुलगी कल्पून आपण तिला गणित शिकवत आहोत अशी कल्पना करून अनेक वृत्तांमधे हा ग्रंथ रचलेला आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार, वर्ग घन वगैरेंच्या पद्धतींपासून ते परमिटेशन कॉम्बिनेशन पर्यंत सर्व प्रकारचे गणित ह्यात आलेले आहे.

खागोलशास्त्रावर चौथ्या शतकात होऊन गेलेल्या आर्यभट्टांचा ग्रंथ, भास्कराचार्यांचा ज्योतिर्गणितावरचा ग्रंथ ही काही उदाहरणे आहेत.

त्याशिवाय साहित्यशास्त्रांतर्गत नाट्यशास्त्र, व्याकरणाशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहासशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादी विषयांवरही खूप ग्रंथसामग्री उपलब्ध आहे.

संस्कृत साहित्यकारांनी आणखी एक ग्रंथलेखनाची शैली विकसीत केली होती ती सूत्रग्रंथांची.

कारण प्राचीनकाळी टिकाऊ लेखनसाहित्य, छपाईचे तंत्र अवगत नव्हते. सर्व ग्रंथ पाठ करून ठेवावे लागत असत. कालांतराने जशी वाङ्मयात भर पडत गेली तसतसे हे वाङ्मय पाठ करून टिकवणे सुद्धा अवघड होऊ लागले. त्यामुळे थोडक्या शब्दात की जेणेकरून ते पाठ करणे सोपे होईल अशी वाङ्मयनिर्मिती करणे ही काळाची गरज ठरली. सूत्रग्रंथ हे थोडक्यात लिहिलेले असल्यामुळे पाठ करणे सुकर होत असे. त्यामुळे प्राचीनकाळी सूत्रशैली अस्तित्वात आली. सूत्र या शब्दाचे दोरा, कठपुतळीच्या संचालनाचा धागा, शिवण्याचा दोरा, वेष्टन, लघुवाक्य असे अनेक अर्थ आहेत. सूत्रशब्दाची व्याख्या अशी आहे -
        अल्पाक्षरमसंदिग्धं सारवद्विश्वतोमुखम् ।
        अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदु: ॥
कमितकमी शब्दात जास्तीत जास्त आशय नि:संदिग्धपणे, अर्थहानी न होता ज्यात सांगितला जातो ते सूत्र. अशा वाङ्मयनिर्मितीच्या वेळी एखादे जरी अक्षर कमी करता आले तरी त्यावेळी विद्वानांना पुत्रजन्माचा आनंद होत असे. विविधांगी ज्ञानसांभार छोट्याशा संपुटात बसवण्याकरता ही अभिनव सूत्रशैली त्याकाळी विकसित झाली. या सूत्रशैलीत निरनिराळ्या विषयांवरचे सूत्रग्रंथ लिहिले गेले. उदा. कल्पसूत्रे, गृह्यसूत्रे, व्याकरणसूत्रे, ब्रह्मसूत्रे वगैरे. असे सूत्रग्रंथ रचून, गुरु आपला शिष्यवर्ग तयार करत असे. सूत्रग्रंथ थोडक्यात लिहिलेले असल्यामुळे त्यातील विषयांचे शंकासमाधान गुरु तोंडी सांगत असत. त्यामुळे सूत्रे पाठ करणे व गुरूंनी सांगितलेला सूत्रार्थ जशाचा तसा लक्षात ठेवणे ही शिष्याची जबाबदारी असे. अध्ययन-अध्यापनाचा जो पाया स्मृती, तिला ताण पडू नये म्हणून जरी सूत्रग्रंथ निर्माण झाले असले तरी गुरूंनी तोंडी सांगितलेला सूत्रार्थ जशाचा तसा लक्षात ठेवतांना स्मृतीला ताण पडतच असे. शिष्य जर सूत्रार्थ विसरला व त्य़ाने त्याचा दुसराच अर्थ सांगितला तर मूळ सूत्राचा अर्थ लोप पावतो. मूळ ग्रंथकाराचा अभिप्राय त्यामुळे लक्षात येणार नाही. सूत्रग्रंथ लिहून जर एखादी पिढी झाली की असे होण्याची शक्यता जास्तच निर्माण होत असे. प्रारंभी कितीही स्पष्टार्थक असले तरी काळाच्या ओघात अखंड, पारंपारिक स्पष्टीकरणाच्या अभावी सूत्रे गूढ, दुर्बोध होऊ लागली. त्यामुळे त्या सूत्राचा मूळ अर्थ, सूत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणे सुद्धा गरजेचे झाले. त्यातून भाष्यग्रंथांची निर्मिती झाली. त्यातून सूत्रग्रंथांवर विवरणवृत्ती, भाष्य, व्याख्या, वार्तिक, टीका इत्यादी विविधरूपात साहित्याचा विकास झाला. भाष्यग्रंथाची व्याख्या अशी आहे -
        सूत्रार्थो वर्ण्यते यत्र पादै: सूत्रानुसारिभि: ।
        स्वपदानि च वर्ण्यन्ते भाष्यं भाष्यविदो विदु: ॥
भाष्यात सूत्राच्या अर्थाचे विवेचन केलेले असते. तदंतर्गत गोष्टींचा खुलासा केलेला असतो. संभाव्य आक्षेपांचे निरसन केलेले असते. तसेच सूत्रावर जर विरुद्ध अर्थ लादले गेले असतील तर त्यांचे खंडन केले असते. भाष्याची ही प्रमुख कार्ये आहेत.

 अशाप्रकारे संस्कृत साहित्य हे एखाद्या विशाल समुद्रासारखे आहे. 





"संस्कृत साहित्याची ओळख ६ - संस्कृत साहित्यातील वाङ्मयप्रकार " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Thursday, July 23, 2020

पाठ ३२ वा सह अव्ययाचा उपयोग

१) संसारकटुवृक्षस्य द्वे फले अमृतोपमे ।
सुभाषितरसास्वाद: सङ्गति: सुजनै: सह ॥२-३॥

अर्थ - संसाररूपी कडु वृक्षाची दोन फळे अमृताप्रमाणे (गोड) आहेत. एक म्हणजे सुभाषितांच्या रसाचा आस्वाद व दुसरे म्हणजे सज्जनांबरोबर संगत.


२) सुभाषितरस्वाद: सज्जनै: सह सङ्गति: ।
सेवा विवेकिभूपस्य दु:खनिर्मूलनं त्रयम् ॥२-९॥

अर्थ - सुभाषितांच्या रसाचा आस्वाद, सज्जनांबरोबर संगत व विवेकी राजाची सेवा या तीन गोष्टी दु:ख समूळ नाहीसे करतात.

किं = काय उपयोग
३) किं कुलेन विशालेन शीलमेवात्र कारणम् ।
कृमय: किं न जायन्ते कुसुमेषु सुगन्धिषु ॥३८-११॥
अर्थ - केवळ कुळ मोठे असून उपयोग काय ? (मोठेपणासाठी) खरतर चारित्र्यच कारणीभूत आहे. सुगंधी फुलांमधे कीटक नाही का निर्माण होत ?
 शीलम् + एव + अत्र

४) किं कोकिलस्य विरुतेन गते वसन्ते किं कातरस्य बहुशस्त्रपरिग्रहेण ।
मित्रेण किं व्यसनकालपराङ्मुखेन किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण ॥४७-१॥

अर्थ - वसंत ऋतू निघून गेल्यावर कोकिळ पक्ष्याच्या ओरडण्याचा काय उपयोग ? भित्र्या मनुष्याने अनेक शस्त्रांचा साठा करून काय उपयोग ? संकटकाळी पराङ्मुख होणार्‍या मित्राचा काय उपयोग ? तसेच निरक्षर मनुष्य जगून तरी काय उपयोग ? 





"३२ वा पाठ सह अव्ययाचा उपयोग " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Wednesday, July 22, 2020

पाठ ३१ वा तृतीया विभक्ती भाग २

आपण परवाच्या तासाला तृतीया विभक्तीचा वापर कसा करायचा ते पाहिले. क्रिया सिद्धीस जाण्यास अत्यंत उपकारी असते त्याला करण कारक म्हणातात व त्या करण कारकाची तृतीया विभक्ती योजावयाची असते.

आता त्याव्यतिरिक्त तृतीया विभक्ती कोणाची योजावयाची असते ते पाहूया.

१) ज्या लक्षणावरून एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते त्या लक्षणबोधक शब्दाची तृतीया विभक्ती होते.
उदा. जटाभि: तापस: ।
जटांवरून तो तपस्वी असल्याचे लक्षात येते, म्हणून जटा या शब्दाची तृतीया विभक्ती वापरलेली आहे. किंवा
स्वरेण स: महेशं अनुसरति ।
स्वराने तो महेशसारखा आहे. म्हणजे त्याचा आवाज महेशसारखा आहे.

२) शरीरामधील व्यंग सुद्धा तृतीया विभक्तीने दाखवले जाते.
उदा. स: नेत्रेण काण: अस्ति ।
तो एका डोळ्याने आंधळा आहे.
स: नेत्राभ्यां काण: अस्ति ।
तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे.
स: कर्णेन बधिर: अस्ति ।
तो एका कानाने बहिरा आहे.

३) हेतुबोधक शब्दांची पण तृतीया विभक्ती योजावयाची असते.
उदा. स: अध्ययनेन पुण्यपत्तने वसति ।
तो अध्ययनाच्या हेतूने पुण्यात रहात आहे.
विद्यया यश: लभते ।
विद्येमुळे यश लाभते.
स्मिता वीणावादनेन शीलां अतिशेते ।
स्मिता वीणा वाजवण्यात शीलाच्या वरचढ आहे.

४) काही अव्ययांना तृतीया विभक्तीची अपेक्षा असते.
सह, सार्धम्, साकम्, समम्, विना, किम्, अलम्, प्रयोजनम,
सीता रामेण सह / सार्धं / साकं वनं गच्छति ।
सीता रामाबरोबर वनात जाते.

मात्रा समं नास्ति शरीरपोषणम् ।
दशरथ: रामेण विना न जीवति ।
दशरथ रामाशिवाय जगू शकत नाही.
जीवितेन किम् ?
जगून काय उपयोग ?
धनेन किम् ?
धनाचा काय उपयोग ?
रोदनेन अलम् ।
रडणं पुरे.

५) फलप्राप्ती संबंधाने सुद्धा तृतीया विभक्ती योजतात.
उदा. - दशभि: वर्षै: अध्ययनं समाप्तम् ।
दहा वर्षांनी अध्ययन समाप्त झाले.

६) तुल्य अशा अर्थानेही तृतीया विभक्ती योजतात.
उदा. स: देवेन समान:, धर्मेण सदृश: ।
तो देवाप्रमाणे आहे. धर्माप्रमाणे आहे.

स्वाध्याय
तू गोत्राने कौशिक आहेस.
सुधाकर डोळ्याने आंधळा आहे.
अभिराम पायाने लंगडा आहे.
विनीत कानाने बहिरा आहे.
धनिक सुखाने जगतो. 
================================

३१ वा पाठ उत्तरे - स्वाध्याय 

१) तू गोत्राने कौशिक आहेस.
त्वं गोत्रेण कौशिक: असि ।

२) सुधाकर डोळ्याने आंधळा आहे.
सुधाकर: नयनेन (नेत्रेण) अन्ध: ।

३) अभिराम पायाने लंगडा आहे.
अभिराम: चरणेन खञ्ज: ।

४) विनीत कानाने बहिरा आहे.
विनीत: कर्णेन बधिर: ।

५) धनिक सुखाने जगतो.
धनिक: सुखेन जीवति । 





"३१ वा पाठ तृतीया विभक्ती भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, July 21, 2020

पाठ ३० वा सुभाषित (तृतीया विभक्तीवर आधारित)

आज मी तुम्हाला व्यंजनांत शब्द शिकवणार आहे. आपण स्वरांत शब्दांमधे अ स्वराने अंत पावणारे पुं. व नपुं शब्द पाहिले, तसेच माला शब्दही पाहिला. पुढच्या स्वरांत शब्दांची ओळख करून द्यायच्या आधी मी व्यंजनान्त शब्द का घेणार आहे असा प्रश्न कदाचित तुम्हास पडेल. पण त्याचे कारण असे आहे की व्यंजनांत शब्द एक पाठ केला की जवळपास किरकोळ भेद सोडले तर सर्व शब्दांची रूपे सारखीच होतात. पुंलिंगी व स्त्रीलिंगी शब्दही जवळपास सारखेच चालतात. हे लक्षात घेणे जास्त सोपे आहे असे वाटून मी प्रथम व्यंजनांत शब्द घेत आहे.

मरुत् (त् कारान्त पुं) = वारा

मरुत्  मरुतौ  मरुत:      प्रथमा
मरुतम् मरुतौ मरुत:      द्वितीया
मरुता मरुद्भ्याम् मरुद्भि:  तृतीया
मरुते मरुद्भ्याम् मरुद्भ्य:  चतुर्थी
मरुत: मरुद्भ्याम् मरुद्भ्य:  पंचमी
मरुत: मरुतो: मरुताम्      षष्ठी
मरुति मरुतो: मरुत्सु       सप्तमी
मरुत् मरुतौ मरुत:        संबोधन

आता आपण तृतीया विभक्तीचा वापर केलेली काही सुभाषिते पाहू.

तृतीया विभक्तीचा उपयोग केलेली सुभाषिते

१) शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया विभाति नभ: ।
पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सर: ॥

अन्वय - शशिना निशा (विभाति) । निशया शशी विभाति । शशिना निशया च नभ: विभाति ।
पयसा कमलं विभाति । कमलेन पय: विभाति । पयसा कमलेन सर: विभाति ।

अर्थ - चंद्रामुळे रात्र शोभून दिसते तर रात्रीमु्ळे चंद्र                                                                                                                                       शोभून दिसतो. आणि चंद्र व रात्र यांच्यामुळे आकाश शोभून दिसते. पाण्यामुळे कमळ शोभून दिसते, कमळामुळे पाणी शोभून दिसते तर पाणी व कमळ यांच्यामुळे सरोवर शोभून दिसते.

२) मणिना वलयं वलयेन मणि: मणिना वलयेन विभाति कर: । कविना च विभु: विभुना च कवि: कविना विभुना च विभाति सभा ॥

अन्वय - मणिना वलयं (विभाति) । वलयेन मणि: (विभाति) । मणिना वलयेन कर: विभाति । कविना च विभु: (विभाति) विभुना च कवि: (विभाति) कविना विभुना च सभा विभाति ॥

अर्थ - रत्नामुळे बांगडी व बांगडीमुळे रत्न शोभून दिसते, आणि रत्नयुक्त बांगडीमुळे हात शोभून दिसतो. तसेच कवीमुळे राजा शोभून दिसतो व राजामुळे कवी शोभून दिसतो आणि राजा व कवीमुळे सभा शोभून दिसते.


३) गुरुशुश्रुषया विद्या पुष्कलेन धनेन वा ।
अथवा विद्यया विद्या चतुर्थी नोपलभ्यते ॥३-४१॥

संधी - न + उपलभ्यते

अन्वय - विद्या गुरुशुश्रुषया लभ्यते । वा पुष्कलेन धनेन लभ्यते । अथवा विद्यया विद्या लभ्यते । चतुर्थी (विद्या न उपलभ्यते) । (इथे लभ्यते हे क्रियापद कर्मणी आहे. त्याची आपण नंतर माहिती करून घेऊ. अर्थ होतो मिळवली जाते.)

अर्थ - गुरूंची सेवा करून, पुष्कळ धन देऊन किंवा विद्येच्या बदल्यात असे विद्या मिळवण्याचे तीन मार्ग आहेत. विद्या प्राप्त करण्याचा चौथा उपाय दिसून येत नाही.

४) श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन दानेन पाणिर्न तु कङ्कणेन ।
विभाति काय: खलु सज्जनानां परोपकारेण न चन्दनेन ॥१६-६॥ (नी.श.)


संधिविग्रह - श्रोत्रं श्रुतेन एव न कुण्डलेन दानेन पाणि: न तु कङ्कणेन ।
विभाति काय: खलु सज्जनानां परोपकारेण न चन्दनेन ॥१६-६॥

अन्वय - (सज्जनानां) श्रोत्रं श्रुतेन एव (विभाति) कुण्डलेन न (विभाति) (सज्जनानां) पाणि: दानेन (विभाति) न तु कङ्कणेन (विभाति) । सज्जनानां काय: खलु परोपकारेण विभाति चन्दनेन न विभाति ।

अर्थ - सज्जनांचे कान कुंडलांनी शोभून दिसत नाहीत, तर विद्येने शोभून दिसतात. त्यांचे हात कंकणांनी शोभून दिसत नाहीत तर दानाने शोभून दिसतात. त्यांचे शरीर चंदनाने शोभून दिसत नाही तर परोपकाराने शोभून दिसते. 





"३० वा पाठ सुभाषित (तृतीया विभक्तीवर आधारित) " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, July 20, 2020

पाठ २९ वा आत्मनेपदी वर्तमानकाळ व तृतीया विभक्ती भाग १

आपण परस्मैपदी धातूंची वर्तमानकाळी रूपे कशी बनवायची ते शिकलो. आज आपण आत्मनेपदी वर्तमानकाळी रूपे शिकणार आहोत.

आता मुळात प्रश्न असा आहे की परस्मैपद व आत्मनेपद अशी धातूंची विभागणी करण्याचे कारणच काय ? क्रियेचे फळ जर अशी विभागणी करंयामधे एक वेगळा विचार होता. क्रियापदाचे फळ जर कर्त्याला मिळत असेल तर क्रियापद परस्मैपदी वापरावे व क्रियेचे फळ जर कर्त्याला स्वत:ला मिळत असेल तर क्रियापद आत्मनेपदी वापरावे.

उदा. यजति/यजते. पुरोहित: यजति । पुरोहित (यजमानासाठी) यज्ञ करतो. इथे यज् धातूचा कर्ता जरी पुरोहित असला तरी त्या धातूचे फळ म्हणजे यज्ञक्रियेचे फळ यजमानाला मिळावे म्हणून तो यज्ञ करतो.

यजमान: यजते ।
यजमान यज्ञ करतो ते यज्ञाचे फळ स्वत:ला मिळण्यासाठी. म्हणून हे क्रियापद आत्मनेपदी झाले.

पुढे असा फरक राहिला नाही. त्यामुळे काही धातू परस्मैपदी व काही धातू आत्मनेपदी अशी विभागणी फक्त राहिली. त्यातला उद्देश बाजूला राहिला. त्यामुळे संस्कृत शब्दांची बाह्य रूपे व्याकरणानुसार राहिली. परंतु अर्थातले भेद हळू हळू शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे काही धातू आत्मनेपदी व काही धातू परस्मैपदी असे संस्कृतचे बाह्यरूप तेवढे टिकून राहिले. सध्या संस्कृतमधे कर्मणी रूपे मात्र आत्मनेपदी प्रत्यय लावूनच केली जातात.

नंतर प्राकृत भाषांमधून आत्मनेपद पूर्णपणे निघून गेले. सगळे धातू व कर्मणी रूपे देखील परस्मैपदीच झाली.

आता आपण आत्मनेपदी वर्तमानकाळ पाहूया.
आत्मनेपदी वर्तमानकाळाचे प्रत्यय

इ   वहे   महे   प्रथम पुरुष
से   इथे   ध्वे   द्वितीय पुरुष
ते   इते   अन्ते   तृतीय पुरुष

वन्द् (१ आ.प) नमस्कार करणे
या धातूला आधी त्या गणाचे अ हे विकरण लागून वन्द् + अ = वन्द हे धातूचे अंग तयार होईल व नंतर त्याला आत्मनेपदी प्रत्यय लागतील.

वन्दे   वन्दावहे   वन्दामहे   प्रथम पुरुष
वन्दसे  वन्देथे   वन्दध्वे   द्वितीय पुरुष
वन्दते  वन्देते   वन्दन्ते   तृतीय पुरुष.

व अथवा म या अक्षरांनी सुरु होणारे प्रत्यय असतील तर धातूच्या अंगपुढे आणखी एक कान्हा येतो. म्हणून वन्दावहे वन्दामहे अशी रूपे झाली आहेत.


आपण इतके दिवस कर्ता, कर्म व विशेषण तसेच क्रियापद वाक्यात कसे योजावयाचे ते पाहिले. वाक्यात कर्ता प्रथमा विभक्तीत, कर्म द्वितीया विभक्तीत व क्रियापद कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे योजावयाचे असते. आज आता आपण तृतीया विभक्ती वाक्यात कोणत्या शब्दांची येते ते पहाणार आहोत.

देवेन   देवाभ्याम्   देवै:   तृतीया

वनेन   वनाभ्याम्   वनै:   तृतीया

तेन         ताभ्याम्      तै:    तृतीया

येन     याभ्याम्       यै:      तृतीया

केन     काभ्याम्     कै:     तृतीया

मालया   मालाभ्याम्   मालाभि:  तृतीया

क्रियापदाने सांगितलेली क्रिया सिद्धीस जाण्यास जे अत्यंत उपयोगी असते त्याला करण म्हणतात. करण म्हणजे क्रियेचे साधन. अशा शब्दाची वाक्यात तृतीया विभक्ती योजावयाची असते. आता उदाहरणार्थ गोपाल: जलेन मुखं प्रक्षालयति । गोपाळ पाण्य़ाने तोंड धुतो. गोपालला मुख धुण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून जल हा शब्द तृतीया विभक्तीत वापरला आहे. आता मुख धुण्यासाठी हात व पाण्यासाठी तांब्या वगैरेंची पण आवश्यकता आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टी असून सुद्धा जर पाणीच नसेल तर मुख धुण्याची क्रिया करता येणार नाही. ‘साधकतमं करणम्’ अत्यंत सहाय्यक असेल ते करण कारक होते. म्हणून येथे जल हे करण-कारक आहे व त्याची तृतीया विभक्ती वापरलेली आहे.


आता खालील वाक्ये पाहूया.

१) अहं हस्तेन लिखामि ।
मी हाताने लिहितो.
२) अहं हस्ताभ्यां नमामि ।
मी दोन्ही हातांनी नमस्कार करतो
३) त्वं चरणाभ्यां चलसि ।
तू दोन्ही पायांनी चालतोस.
४) स: नयनाभ्यां पश्यति ।
तो दोन्ही डोळ्यांनी पहातो.
५) कुम्भकार: दण्डेन चक्रं चालयति ।
कुंभार दंडाने चक्र फिरवतो.
६) स्वर्णकार स्वर्णेन अलङ्कारान् निर्माति ।
सोनार सोन्याने अलंकार तयार करतो
७) सेवक: स्कन्धेन भारं वहति ।
सेवक खांद्याने ओझे वहातो


तृतीया विभक्तीवर आधारित पाठ
स्वाध्याय -
१) देव गीताने प्रसन्न होतो.
२) तुम्ही दोघे हातांनी नमस्कार करता
३) राम कोणत्या मार्गाने जातो ?
४) कान कुंडलांनी शोभतात.
५) चंद्रामुळे रात्र शोभते
६) गाय़क गोड आवाजाने गातो.
७) मुली चेंडूने (कन्दुक) खेळतात.
८) आंधळा स्पर्शाने जाणतो.
९) कष्टाने धन मिळते.
१०) व्याध बाणाने सिंहाला ठार मारतो.
११) लोक विमानाने परदेशी जातात
१२) सदाचाराने मन शुद्ध होते 

 ====================
उत्तरे - २९ वा पाठ 

आत्मनेपदी वर्तमानकाळ व तृतीया विभक्ती भाग १

तृतीया विभक्तीवर आधारित पाठ
स्वाध्याय -
१) देव गीताने प्रसन्न होतो.
देव: गीतेन प्रसीदति ।

२) तुम्ही दोघे हातांनी नमस्कार करता
युवां हस्ताभ्यां नमथ:

३) राम कोणत्या मार्गाने जातो ?
राम: केन मार्गेण गच्छति ?

४) कान कुंडलांनी शोभतात.
कर्णौ कुण्डलाभ्यां शोभेते । किंवा कर्णं कुण्डलेन शोभते ।

५) चंद्रामुळे रात्र शोभते
चन्द्रेण निशा शोभते ।

६) गाय़क गोड आवाजाने गातो.
गायक: मधुरेण स्वरेण गाय़ति ।

७) मुली चेंडूने (कन्दुक) खेळतात.
बालिका: कन्दुकेन क्रीडन्ति ।

८) आंधळा स्पर्शाने जाणतो.
अन्ध: स्पर्शेण अवगच्छति ।

९) कष्टाने धन मिळते.
कष्टेन (कष्टै:, प्रयत्नेन) धनं लभते ।

१०) व्याध बाणाने सिंहाला ठार मारतो.
व्याध: बाणेन सिंहं हिंसति ।

११) लोक विमानाने परदेशी जातात
जना: विमानेन परदेशं गच्छन्ति ।

१२) सदाचाराने मन शुद्ध होते
सदाचारेण मानसं पवित्रं भवति । 





"२९ वा पाठ आत्मनेपदी वर्तमानकाळ व तृतीया विभक्ती भाग १ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Friday, July 17, 2020

संस्कृत साहित्याची ओळख - ५ - महाभारत

संस्कृत साहित्याची ओळख - ५ - महाभारत

    रामायण व महाभारत ही भारत देशाची दोन आर्ष महाकाव्ये. आर्ष म्हणजे ऋषींनी लिहिलेली. रामायण हे काव्य वाल्मीकी ऋषींनी लिहिले. त्यात श्रीरामांचे चरित्र गायिले आहे. ‘महाभारत’ हे काव्य व्यास महर्षींनी लिहिले. व्यास ऋषींच्या नावावर खूप साहित्य प्रसिद्ध आहे. वेदसंहितांपासून पुराणांपर्यंत व्यास नावाचा उल्लेख आला आहे. अठरा पुराणे, अठरा उपपुराणे, महाभारत, वेदांतदर्शन, असे व्यासांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. वेदांचे विभाजनही व्यासांनी केले आहे.

    महाभारताचे महत्व त्याच ग्रंथात आरंभी वारंवार आलेले आहे. पण स्वत: व्यासांनी आपल्या ह्या ग्रंथाचे महत्व ब्रह्मदेवाला सांगितले आहे.

    व्यासांनी ह्या ‘भारत’ ग्रंथाची अंतर्यामी सुव्यवस्थित रचना केली. वेदांचे रहस्य, त्यातील इतर विस्तार, सांगोपांग उपनिषदे, इतिहास, पुराणे, कालाची त्रिविध स्थिती, न्याय, शिक्षा, चिकित्सा, दान पुण्यतीर्थे, पवित्र देश, नद्या पर्वत, वने, समुद्र, युद्धोपयोगी शस्त्रास्त्रविचार, लोकाचार असे अनेकविध विषय त्या काव्यात होते. परंतु ह्या काव्याचा लोकात प्रसार झाला तर त्या काव्यरचनेचा उपयोग. आणि त्यासाठी ते लिखित स्वरूपात उपलब्ध झाले पाहिजे. पण व्यासांना चिंता होती की ह्या काव्याचा लेखक कोण होईल ? तेव्हा ब्रह्मदेवांनी व्यासांना गणपतीची प्रार्थना करण्यास सांगितले व तुझ्या काव्याची बरोबरी करू शकेल असा ग्रंथ होणार नाही असा आशीर्वादही दिला. त्याप्रमाणे व्यासांनी गणेशाची प्रार्थना केली. गणपती प्रकट झाला. तेव्हा व्यास म्हणाले - ‘लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक’ हे गणेशा, तू या ‘भारत’ ग्रंथाचा लेखक हो. मी याची मनातल्या मनात रचना केली आहे. तेव्हा गणपतीने अट घातली की मी लिहीत असतांना क्षणभर जरी माझी लेखणी विराम पावली तर मी ह्या ग्रंथाचा लेखक होणार नाही. तुम्ही अखंडपणे हा ग्रंथ सांगितला पाहिजे.’ तेव्हा व्यासांनी पण गणेशाला अट घातली की, मी सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे.’ गणेशाने ह्या गोष्टीला संमत्ती दिली. नंतर व्यास ग्रंथ सांगत होते व गणपति लिहून घेत होता. तेव्हा व्यास मधून मधून कूट श्लोक सांगत असत. त्या श्लोकांचा बाह्यार्थ एक असे व गूढार्थ एक असे. तो समजून घेण्यास गणपतीला काही काळ विचार करावा लागे. तोपर्यंत व्यास पुढील श्लोकांची रचना करत असत. असा हा महान ग्रंथ म्हणजे व्यासांनी आपल्याला दिलेले सांस्कृतिक धन आहे.

तीन संस्करणे -

    महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी
    नारयणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
    देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥
असा श्लोक आहे. नारायण म्हणजे श्रीकृष्ण, नरोत्तम म्हणजे श्रेष्ठ असा अर्जुन, देवी सरस्वती व व्यास ह्यांना वंदन करून मग जय नावाच्या इतिहासाचे पठण करावे. असे यात म्हटले आहे.
    ह्यावा अर्थ या ग्रंथाचे नाव जय असे होते. व्यासांनी कौरव व पांडव ह्यांच्या युद्धाचे वर्णन करून कौरवांवर पांडवांनी जय कसा मिळवला तो ‘जय’ नावाचा इतिहास लिहाला होता. तो त्यांनी आपला पुत्र शुक व आपल्या पैल, सुमंतु, जैमिनी व वैशंपायन या चार शिष्यांना शिकवला अर्थातच त्यांनी तो तोंडपाठ केला होता. यज्ञप्रसंगी मोकळ्या वेळात हे कथानक सांगितले जात असे. ज्यावेळी इतिहास लिहिला त्यावेळी त्यातील सर्व पात्रे व त्यांची पार्श्वभूमी त्या काळातील लोकांना ज्ञात होती. ती ज्ञात आहे असे गृहीत धरूनच हा इतिहास रचला गेला.

    पुढे अर्जुनाचा पणतु जनमेजय याने सर्पसत्र आरंभले. कारण त्याचा पिता राजा परिक्षित सर्पदंशाने मृत्युमुखी पडला होता. त्यावेळी व्यास व वैशंपायन जिवंत होते. तेव्हा व्यासांच्या सांगण्यावरूनच ‘जय’ नावाचा इतिहास वैशंपायनाने राजा जनमेजयास ऐकवला. परंतु ज्या गोष्टी व्यासांनी गृहीत धरल्या त्या जनमेजयास माहीत नसाव्यात. त्याने हा इतिहास ऐकत असता अधून मधून शंका विचारल्या. तेव्हा वैशंपायनांनी त्याच्या शंकांचे निरसन केले. होता होता श्लोकसंख्या वाढत २४००० पर्यंत गेली. भारत ह्या ग्रंथामधे आख्याने व उपाख्याने नसावीत.  मग ह्या ‘जय’ नावाच्या इतिहासाला ‘भारत’ असे नाव मिळले. हे महाभारताचे दुसरे संस्करण होते.

    जनमेजयाच्या सर्पसत्रानंतर काही वर्षांनी शौनक ऋषींनी नैमिषारण्यात द्वादशवार्षिक यज्ञसत्र आरंभले. द्वादशवार्षिक सत्र म्हणजे १२ वर्षे चालणारा यज्ञ. त्यावेळी लोमहर्षणाचा पुत्र सौति हे ऋषी उपस्थित होते. सौतीने सर्पसत्राच्या वेळी वैशंपायनाने सांगितलेले ‘भारत’ ऐकले होते. म्हणून शौनक ऋषींनी सौतीला ‘भारत’ ऐकवण्याची विनंती केली. तेव्हा पुन्हा श्रोत्यांमधून नाना प्रश्न विचारले जात. कौरव कोण होते, पांडव कोण होते ? तेव्हा सौतीकडून पुन्हा त्यात भर घातली गेली. आपले हे काव्य परिपूर्ण असावे म्हणून त्यात सौतीने आख्याने, उपाख्याने यांची जोड देऊन श्लोकसंख्या जवळ जवळ १ लाखावर नेऊन ठेवली. हे या ग्रंथाचे तिसरे संस्करण. याच्या विशालतेमुळे ह्या ग्रंथाला महाभारत असे नाव मिळाले. सौतीने ह्या भारत ग्रंथात अनेक आख्याने, उपाख्याने व परिशिष्टाच्या स्वरूपात हरिवंश ह्याला जोडले. त्यामुळे हा विशालकाय ग्रंथ झाला. इ. स. पूर्व ६०० ते ७०० वर्षे ह्या भारत ग्रंथाचे ‘महाभारत’ असे नामकरण झाले. महाभारत ही एका काळाची रचना नसून ८०० ते १००० इतका प्रदीर्घ काळ ह्या रचनेस लागला असावा. थोडक्यात महाभारत ही एका काळाची रचना नाही. त्याचा एकच एक निर्माता नाही. ह्या ग्रंथाचे वर्तमान रूप शेकडो वर्षांच्या कालावधीत निर्माण झाले आहे.

    अशाप्रकारे या मूळ ‘जय’ नावाच्या इतिहासाला महाभारताचे मिळालेले रूप म्हणजे ज्ञानकोशाचे स्वरूप आहे. भारतीयांनी जे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले ते प्राप्त करण्याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणजे महाभारत. महाभारताला ‘पंचम वेद, क्षत्रिय वेद, कृष्णवेद, वैष्णवांची स्मृति, शतसाहस्रीसंहिता’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. या ग्रंथाचा १/४ भाग हा कथावर्णनपर आहे व ३/४ भाग उपदेशपर आहे. म्हणून विंटरनिट्झ या ग्रंथाला साहित्याचे पूर्ण रूप मानतो.

    महाभारत हा ग्रंथ हा केवळ इतिहसग्रंथ नाही तर तो पुराण, महाकाव्य, धर्मग्रंथ, अर्थशास्त्र, विश्वकोश, सर्वकाही आहे. भौतिक जीवनाची नि:सारता दाखवून मानवाला मोक्षमार्गावर आरूढ करणे हा महाभरताचा उद्देश आहे.

        प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनीने ‘भारत’ या शब्दाचा अर्थ संग्राम असा सांगितला आहे. म्हणून महाभारत म्हणजे महासंग्राम. कौरव-पांडवांच्या महासंग्रामाची कथा यात आहे. म्हणून याचे नाव महाभारत.

    आपल्या हक्काच्या राज्याची पुनर्प्राप्ती करून घेण्यासाठी पांडवांना कौरवांबरोबर युद्ध करावे लागले. त्यावेळी भरतखंडात असणार्‍या सर्व राजवंशांनी या युद्धात भाग घेतला होता. एकूण अठरा अक्षौहिणी सेना युद्धार्थ कुरुक्षेत्रावर जमली होती. एक अक्षौहिणी म्हणजे २१८७० रथ २१८७० हत्ती, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ. अशी १८ अक्षौहिणी सेना रणभूमीवर जमलेली होती. अनेकविध वरुणास्त्र, पर्जन्यास्त्र, ब्रह्मास्त्र वगरे अस्त्रे व धनुष्यबाण, गदा वगैरे शस्त्रे यांचा युद्धासाठी वापर केला गेला. आणि जमलेल्या ह्या सर्व सैन्याची या रणयज्ञात आहुती पडली. पण अखेर पांडवांना जय मिळाला. हा पांडवांना जय कसा मिळाला त्याचा इतिहास व्यासांनी ‘जय’ नावाने लिहिला.

आता प्रश्न असा आहे की व्यासांनी यातील नेमक्या किती श्लोकांची रचना केली असावी ? महाभरतातच एक श्लोक येतो की -
    अष्टौ श्लोकसहस्राणि अष्टौ श्लोकशतानि च ।
    अहं वेद्मि शुको वेत्ति संजयो वेत्ति वा न वा ॥
महाभारतातील ८८०० श्लोक मी जाणतो, शुक सुद्धा जाणतो. पण संजय जाणत असेल किंवा नसेल.

या श्लोकावरून मॅक्डोनेलनी ८८०० ही जय नावाच्या इतिहासाची श्लोकसंख्या ठरवली आहे. पण ही वास्तविक महाभारतातील कूटश्लोकांची संख्या आहे. मूळ जय नावाच्या इतिहासातील श्लोकांची संख्या नक्कीच जास्त असावी.

    चिंतामणि विनायक वैद्य यांच्या मतानुसार व्यासकृत भारताची रचना इ. स. पूर्व ३१०० मधे झाली व सौतिद्वारा परिवर्धित महाभारताचे निर्माण इ. स. पूर्व २००० मधे झाले.

    भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, अनुगीता, भीष्मस्तवराज व गजेंद्रमोक्षस्तोत्र ही पंचरत्ने महाभारतात समाविष्ट झालेली आहेत. संस्कृत काव्य, नाटक, महाकाव्ये व चंपू साहित्य महाभारतातील कथानकांवर आधारित आहेत.

    कोणी जर आपल्याला विचारले की ‘तुमचे तत्वज्ञान, नीतिशास्त्र, धर्मतत्वे, इतिहास काय आहे; तुमची सर्वांगीण सुधारणा कोठेपर्यंत पोचली होती ? तर त्याला आपल्याजवळ उत्तर एकच आहे की ‘महाभारत पहा’. सृष्ट्युत्पत्तीच्या प्राचीन कल्पनांपासून नीतिशास्त्राच्या अत्युत्तम तत्वांपर्यंत, राजनीतिपासून प्रगत युद्धशास्त्रापर्यंत, मनुष्याच्या सामान्य जीवनाच्या चित्रणापासून मनुष्याचे जे अंतिम प्राप्तव्य मोक्ष तेथपर्यंत कोणताही विषय ह्यात आला नाही असे नाही. म्हणून ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ म्हणजे व्यासांनी सर्व जग उष्टे केले आहे असे म्हटले जाते. म्हणजे कोणताही विषय व्यासांना अस्पृष्ट नाही. जगामधे ज्या घडामोडी, कथानके दिसून येतात त्यांचा समावेश महाभारतात आहे. महाभारत म्हणजे रत्नाकर आहे. या रत्नाकरात बुडी मारावी व ज्याला जे पहिजे असेल ते रत्न त्याने घ्यावे. महाभारत म्हणजे भारतभूवर घडलेला सर्वांगसुंदर प्राचीन इतिहास. एवढा मोठा इतिहास व असे काव्य जगाच्या पाठीवर दुसरीकडे कोठेही झाले नाही.

महाभारतात एकूण अठरा पर्वे म्हणजे प्रकरणे आहेत. व त्यात पुन्हा अनेक उपपर्वे आहेत व उपपर्वात अनेक अध्याय आहेत.
१) आदिपर्व - २३३ अध्याय
    या पर्वात कुरुवंशात पांडवांच्या पूर्वी होऊन गेलेल्या राजांचा इतिहास व धृतराष्ट्राचा पितामह राजा शांतनु पासून इतिहासास प्रारंभ करून कौरव-पांडवांचे विवाह, राज्याचे दोन भाग होऊन हस्तिनापूरचे राज्य कौरवांकडे व इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांना अशी विभागणीपर्यंतचा कथाभाग आला आहे.
२) सभापर्व - ८१ अध्याय
    सभापर्वात पांडवांनी राज्याचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्यांचा पराक्रम, दुर्योधनाचे कपटद्यूत व पांडवांचा १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास भोगण्यासाठी वनगमनापर्यंतचा भाग आला आहे.

३) वनपर्व - ३१५ अध्याय
        वनपर्वात पांडवांची वनातील रहाणी, तेथे त्यांच्यावर बेतलेले प्रसंग, भरतखंडातील विविध तीर्थक्षेत्रांचे वर्णन, अर्जुनाचे अस्त्र-शस्त्रप्राप्तीसाठी तपस्या करणे व अस्त्रे मिळवून परत येणे व वनवासाचा काळ संपलेला असल्यामुळे अज्ञातवासासाठी विराट राजाच्या नगरीत येणे इथपर्यंतचा कथाभाग आलेला आहे.

४) विराट पर्व - ७२ अध्याय
    विराटाच्या नगरीत पांडवांचे एक वर्ष अज्ञातवासाचे वर्णन व तेथे आलेले अनुभव यांचे वर्णन आहे.

५) उद्योगपर्व - १९६ अध्याय
    या पर्वामधे पुढील रणनीतीची आखणी, संजयशिष्टाई, श्रीकृष्ण शिष्टाई, दुर्योधनाचा पांडवांना त्यांचे राज्य परत करण्यास नकार व शेवटी दोन्ही बाजूच्या सैन्याचे रणभूमीवर प्रस्थान यांचे वर्णन आहे.

६) भीष्मपर्व - १२२ अध्याय
    युद्धास सुरवात होण्यापूर्वी श्रीकृष्णांचा अर्जुनाला गीतोपदेश, युद्धामधे भीष्मांचा पराक्रम दहाव्या दिवशी भीष्मांचे रणांगणात पतन हा भाग यात आलेला आहे.

७) द्रोण पर्व - २०२ अध्याय
    भीष्म शरपंजरी पडल्यावर द्रोणांकडे कौरवांचे सेनातित्व, द्रोणांचा पराक्रम व द्रोणांचा युद्धात वध यांचे वर्णन आहे.

८) कर्णपर्व - ९६ अध्याय
    द्रोणांच्या नंतर सेनेचे अधिपत्य कर्णाकडे व कर्णवध हा भाग यात आलेला आहे.

९) शल्यपर्व - ६५ अध्याय
    कर्णानंतर कौरवांचा सेनानायक शल्य व शल्यवध, दुर्योधन व भीमसेनाचे प्रसिद्ध द्वंद्वयुद्ध व दुर्योधनाचा पराभव यांचे वर्णन आहे.

१०) सौप्तिक पर्व - १८ अध्याय
    अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा झोपलेल्या द्रौपदीच्या पाचही पुत्रांचा वध करतात, अश्वथाम्याचे पांडवांचा एकुलता एक अंश जो उत्तरेच्या गर्भात वाढत होता त्याच्यावर ब्रह्मस्त्र सोडणे, अश्वत्थाम्याला श्रीकृष्णाचा शाप हा भाग आलेला आहे.

११) स्त्रीपर्व - २७ अध्याय
    गांधारी सर्व कौरवस्त्रियांचे रणभूमीवरची परिस्थिती पाहून शोक, गांधारीचा श्रीकृष्णाला शाप, युधिष्ठिराकडून कौरवांचा श्रद्धविधी, कर्ण आपला मोठा भाऊ होता हे कळताच युधिष्ठिराचा स्त्रीजातीला शाप, हा कथाभाग आलेला आहे.

१२) शांतिपर्व - ३६५ अध्याय
    राज्य प्राप्र झाल्यावर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडून युधिष्ठिराचे उपदेशग्रहण, हा कथाभाग आलेला आहे.

१३) अनुशासनपर्व - १६८ अध्याय
    भीष्मांकडून युधिष्ठिराचे सांत्वन, पुन्हा युधिष्ठिराला नानाविध उपदेश व भीष्मांचे स्वर्गारोहण हा कथाभाग आलेला आहे.

१४) आश्वमेधिक पर्व - ९२ अध्याय
    युधिष्ठिराचे धर्माने राज्याचे प्रतिपालन, अनुगीता, व्यासांच्या सांगण्यावरून युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ, उत्तरेचे मृत मुलाला जन्म देणे, श्रीकृष्ण मृत बालकाला जिवंत करतात, युधिष्ठिराची अश्वमेध यज्ञाची समाप्ती, हा कथाभाग आलेला आहे.

१५) आश्रमवासिक पर्व - ३९ अध्याय
    धृतराष्ट्र, गांधारी व कुंती वानप्रस्थ स्वीकारतात व वनाला लागलेल्या वणव्यात तिघांचाही मृत्यु होतो. हा कथाभाग आलेला आहे.
.
१६) मौसल पर्व - ८ अध्याय
    यादववंशाचा नाश कसा झाला ते सांगितले आहे.

१७) महाप्रास्थानिक पर्व - ३ अध्याय
    श्रीकृष्णाच्या महाप्रस्थानानंतर पांडवांचे महाप्रस्थान व युधिष्ठिराचे सदेह स्वर्गाला जाणे. हा कथाभाग आलेला आहे.

१८) स्वर्गारोहणपर्व - ५ अध्याय
    स्वर्गात युधिष्ठिराचे आपल्या बंधूंना व श्रीकृष्णाला भेटणे व महाभारताचा उपसंहार केलेला आहे.

एकूण अध्याय २१०७ व श्लोकसंख्या सुमारे १ लाख. 






"संस्कृत साहित्याची ओळख - ५ - महाभारत " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Thursday, July 16, 2020

पाठ - २८ वा अव्यये

संस्कृतमधील अव्यये

अथ - आरंभ / मंगल
असकृत् - परत परत
सकृत् - एक वेळा
इति - समाप्ती, हेतू
अपि - सुद्धा
अवश्य - जरूर
अद्य - आज
अधुना - आता
अलम् - पुरे
शनै: शनै: - हळूहळू
श्व: - उद्या
ह्य: - काल
साकम्, सह - (अमक्याच्या) बरोबर
स्वयम् - आपोआप
आदि - वगैरे
इदानीम् - यावेळी
इव - प्रमाणे
इह - येथे
किम् = काय
च - आणि
अत: - म्हणून
इत: - येथून
अग्रत: - पुढून
तत: - तेथून, नंतर
कुत: - कोठून
यत: - जेथून, कारण
सर्वत: - सर्वबाजूंनी
तथा - त्याप्रमाणे
तत् - पूर्वी सांगितलेले
न, नो - नाही
नम: - नमस्कार
पश्चात् - मागाहून
पृथक् - वेगळे
प्राय: - बहुधा, नेहेमी
वरम् - उत्तम
वा - किंवा
विना - शिवाय
कथम् - कसे
एकत्र - एके ठिकाणी
अत्र - येथे

तत्र - तेथे 
यत्र - जेथे
कुत्र - कोठे
सर्वत्र - सर्व ठिकाणी
यत्र - येथे
द्विधा - दोन प्रकारे, दोन भागात
त्रेधा - तीन प्रकारे, तीन भागात
तावत् - तोपर्यंत
यावत् - जोपर्यंत
अनेकश: - अनेक प्रकारे
यथा - ज्याप्रमाणे
इत्थम् - अशाप्रकारे
पञ्चकृत्व: - पाच वेळा 


Wednesday, July 15, 2020

पाठ २७ वा लेखनसाहित्यम्

प्रसाद: - अहं प्रसाद: नाम बालक: । त्वम् उषा नाम बालिका । अहं छात्र:, त्वं छात्रा ।

उषा - प्रसाद, एतत् मम लेखनपीठम् । तत् तव लेखनपीठम् ।

प्रसाद: - एतत् कस्य पुस्तकम् ?

उषा - एतत् मम पुस्तकम्, तत् तव पुस्तकम् ।

प्रसाद: - शोभनं तव पुस्तकम् । एषा मम पुस्तिका । मम पुस्तिका अपि शोभना ।

उषा - एषा मम लेखनी । कुत्र तव लेखनी ?

प्रसाद: - अत्र मम लेखनी । मम लेखनी कृष्णा । तव लेखनी नीला ।

उषा - मम लेखनी दीर्घा । तव अपि लेखनी दीर्घा । एतत् मसिपात्रम् ।

प्रसाद: - अये, एष: दीप: । एष: विद्युत्दीप: सुन्दर: ।
 दीपस्य प्रकाश: अपि शोभन: । एतत् सर्वं मम स्वाध्यायस्य साहित्यम् । एष: मम स्वाध्यायसमय: ।

उषा - मम अपि एष: स्वाध्यायस्य समय: । पश्य

लेखनी पुस्तिका दीपो मसिपात्रं च पुस्तकम् ।
लेखनस्यापि पीठं च स्वाध्याये प्रेरयन्ति माम् ॥

कठिण शब्दांचे अर्थ -
लेखनपीठ - टेबल
पुस्तिका = वही
लेखनी = पेन लेखणी
कृष्णा = काळी
नीला = निळी
दीर्घा = लांब
मसिपात्र = शाईची दौत
प्रेरयन्ति - प्रेरणा देतात.
कीदृशी = कशी

प्रश्न १) - उत्तराणि लिखत ।
१) एष: केषां संवाद ?
२) प्रसादस्य पुस्तिका कीदृशी ?
३) कृष्णा लेखनी कस्य अस्ति ?
४) नीला लेखनी कस्य असति ?
५) किं किं स्वाध्यायस्य साहित्यम् ?

प्रश्न २) - सुन्दर या विशेषणाचे योग्य ते रूप वापरा.।
१) लेखनी -----
२) दीपा: ----
३) लेखनपीठानि  ----
४) पुस्तिका: 

Tuesday, July 14, 2020

पाठ २६ वा सुभाषितानि

१) नक्षत्रभूषणं चन्द्रो नारीणां भूषणं पति: । पृथिवीभूषणं राजा विद्या सर्वस्य भूषणम् ॥

२) प्रदोषे दीपकश्चन्द्र: प्रभाते दीपको रवि: ।
त्रैलोक्ये दीपको धर्म: सुपुत्र: कुलदीपक: ॥

३) अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रममित्रस्य कुत: सुखम् ॥

४) वृथा वृष्टि: समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपि च ॥

कठिण शब्दांचे अर्थ -
प्रदोष = रात्रीचा अरंभकाळ
दिवा = दिवसा
अलस = आळशी

प्रश्न १ ला उत्तराणि लिखत ।

१) चन्द्र कस्य भूषणम् ?
२) नारीणां भूषणं किम् ?
३) सर्वस्य भूषणं किम् ?
४) प्रदोषे क: दीपक: अस्ति ?
५) प्रभाते क: दीपक: अस्ति ?
६) धर्म: कस्य दीपक: ?
७) क: कुलदीपक: ?
८) क: विद्यां न अधिगच्छति ?
९) वृष्टि: कदा व्यर्था भवति ?
१०) दीप: कदा व्यर्थ: भवति ?

प्रश्न २) पूर्ण करा

लिखामि ----   ----
-----  वसथ:   ----
-----  ------   अटन्ति 

Monday, July 13, 2020

पाठ २५ वा परिचयः

एष: वैद्य: अस्ति । श्रीकान्त: इति तस्य नामधेयम् ।  स: प्रतिदिनं रुग्णालयं गच्छति । स: रुग्णेभ्य: औषधं यच्छति ।

एषा रुग्णसेविका । गीता इति तस्या: नामधेयम् । सा अपि प्रतिदिनं रुग्णालयं गच्छति । सा रुग्णसेवां करोति । तस्या: जीवनं श्रमपूर्णम् ।

एतत् औषधम् । औषधं मनुष्यस्य जीवनं खलु ।
तद् तस्य जीवनम् आरोग्यपूर्णं करोति । औषधं जाह्नवीतोयं इति वचनं प्रसिद्धम् ।

कठिण शब्दांचे अर्थ -
करोति - करतो, करते

काही प्रश्नार्थ अव्यये
किम् - काय, का
किमर्थम् - कशासाठी
कुत: - कोठून
कथम् - कसे
कुत्र - कोठे
कदा - केव्हा
क्व - कोठे

२५ वा स्वाध्याय
प्रश्न १ उत्तराणि लिखत -
१) वैद्यस्य किं नामधेयम् ?
२) वैद्य: प्रतिदिनं कुत्र गच्छति ?
३) स: रुग्णेभ्य: किं यच्छति ?
४) गीता इति कस्या: नामधेयम् ?
५) गीताया: व्रतं किम् अस्ति ?
६) कस्या: जीवनं श्रमपूर्णम् ?
७) औषधविषयकं किं वचनं प्रसिद्धम् ?

प्रश्न २ पूर्ततां कुरु ।


ए. व.  द्वि. व.  ब. व.
नरस्य   ----   ----        षष्ठी
----   -----    अनला:   प्रथमा
सज्जनं -----   -----      द्वितीया
-----    ----   नक्रै:   तृतीया
------   -----   जनकेभ्य: पंचमी
-----   पिकाभ्याम्  -----  चतुर्थी
करे    -----     -----   सप्तमी 

२५ वा पाठ उत्तरे

भाषांतर - 


१) हा वैद्य आहे. श्रीकांत असे त्याचे नाव आहे. तो दररोज रुग्णालयात जातो. तो रुग्णांना औषध देतो.

२) ही रुग्णसेविका आहे. गीता असे तिचे नाव आहे. ती सुद्धा दररोज रुग्णालयात जाते. ती रुग्णसेवा करते. तिचे जीवन कष्टमय आहे.

३) हे औषध आहे. औषध हे मनुष्याचे जीवनच आहे. ते त्याचे जीवन आरोग्यपूर्ण करते. औषध म्हणजे ‘गंगेचे पाणी’ हे वचन प्रसिद्ध आहे.

२५ वा स्वाध्याय 


प्रश्न १ उत्तराणि लिखत -
१) वैद्यस्य किं नामधेयम् ?
उत्तर - श्रीकान्त इति वैद्यस्य नामधेयम् ।

२) वैद्य: प्रतिदिनं कुत्र गच्छति ?
वैद्य: प्रतिदिनं रुग्णालयं गच्छति ।

३) स: रुग्णेभ्य: किं यच्छति ?
उत्तर - स: रुग्णेभ्य: औषधं यच्छति ।

४) गीता इति कस्या: नामधेयम् ?
उत्तर - गीता इति रुग्णसेविकाया: नामधेयम् ।

५) गीताया: व्रतं किम् अस्ति ?
उत्तर - रुग्णसेवा इति गीताया: व्रतम् अस्ति ।

६) कस्या: जीवनं श्रमपूर्णम् ?
उत्तर - गीताया: जीवनं श्रमपूर्णम् ।

७) औषधविषयकं किं वचनं प्रसिद्धम् ?
उत्तर - ‘औषधं जाह्नवीतोयम्’ इति औषधविषयकं वचनं प्रसिद्धम् ।


प्रश्न २ पूर्ततां कुरु ।
ए. व.  द्वि. व.  ब. व.
नरस्य   नरयो:  नराणाम्        षष्ठी
अनल:  अनलौ  अनला:      प्रथमा
सज्जनं  सज्जनौ  सज्जनान्    द्वितीया
नक्रेण  नक्राभ्याम्   नक्रै:     तृतीया
जनकात्  जनकाभ्याम्  जनकेभ्य: पंचमी
पिकाय   पिकाभ्याम्  पिकेभ्य:  चतुर्थी
करे     करयो:      करेषु     सप्तमी 



Saturday, July 11, 2020

संस्कृत साहित्याची ओळख - ४ - रामायण

आपण आठवड्यातून एक दिवस संस्कृत साहित्याची ओळख करून घेत आहोत. त्यात वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. नंतर प्रासंगिक निमित्ताने व्यास व कालिदास यांची माहिती करून घेतली. वेदवाङ्मयानंतर माहिती करून घेण्याचा क्रम येतो तो रामायणाचा.

वेदांचे चार भाग आहेत. संहिता, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके व उपनिषदे. त्यापैकी पहिले दोन भाग वैदिकयुगांतर्गत येतात तर पुढचे दोन भाग उत्तर वैदिकयुगात येतात. नंतरचा काळ आहे तो रामायण व महाभारत या महाकाव्यांचा. भाषेच्या दृष्टीने सुद्धा वेदवाङ्मय व रामायण यात खूप अंतर आहे. वेदातील सूक्ते ही गायत्री, जगती वगैरे छंदात रचलेली आहेत. छंद म्हणजे वृत्त. रामायण हे अनुष्टुभ् छंदात रचलेले काव्य आहे. अनुष्टुभ् छंदात आठ अक्षरांचे चार चरण असतात. आपण जी सुभाषिते पहात होतो ती सर्व अनुष्टुभ् छंदातील होती. आता उत्तर वैदिक युग व रामायण यांच्या मधल्या कालखंडात काही साहित्य होऊनही गेले असेल. पण ते उपलब्ध नाही. वेदांनंतर उपलब्ध असणारे प्राचीन साहित्य कोणते तर रामायण व महाभारत. हे कुशीलव व सूत परंपरेतून आलेले आहे. ही आख्याने यज्ञ वगैरे प्रसंगी तोंडी सांगितली जात असत. नंतर केव्हातरी त्याला ग्रंथरूप मिळालेले आहे.

रामायण हे भारतीय साहित्यातील तसेच विश्वसाहित्यातील सुद्धा पहिले महाकाव्य आहे. म्हणून त्याला आदिकाव्य असे म्हणतात. वाल्मीकींनी ते रचलेले आहे. रामायणातच अशी कथा सांगितली आहे की एकदा वाल्मीकी ऋषी नेहेमीप्रमाणे तमसा नदीवर स्नानासाठी चालले होते. तेथे झाडावर एक क्रौंच पक्षाचे जोडपे क्रीडा करत होते. त्यावेळी तिथे एक पारधी आला व त्याने त्यातील एका पक्षाला ठार केले. आपला जोडीदार मृत्यु पावलेला पाहून दुसरा क्रौंच पक्षी अतिशय शोक करत होता. ते दृश्य वाल्मीकींच्या नजरेस आले. त्या क्रौंच पक्षाचा विलाप ऐकून त्यांना खूप वाईट वाटले व त्या दु:खाच्या भरात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वतीसमा: ।
यात्क्रौञ्चमिथुनादेकमधी: काममोहितम् ॥७५-२॥

अर्थ - हे पारध्या, या जगात यापुढे कधीही तुला मानसन्मान (मुक्ती) मिळणार नाही. कारण प्रेमात वेड्या झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील एकाला तू ठार मारले आहेस.

त्यांच्या मुखातून हा पारध्याला शाप दिला गेला. नंतर ते स्नान करून आपल्या कुटीत परतत असता त्यांच्या मनात विचार आला की हा श्लोक माझ्या मुखातून कसा बाहेर पडला ? ही आठ आठ अक्षरांनी युक्त अशी रचना आहे. तोपर्यंत संस्कृत साहित्यात या छंदात रचना झालेली नव्हती. आपल्या कुटीत याबद्दलचा विचार करत ते बसले असता तेथे ब्रह्मदेव प्रगट झाले व त्यांनी त्यांना या छंदात रामायणाची रचना करण्याचा आदेश दिला. व आशीर्वादही दिला की -

यावद् स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले ।
तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ॥

अर्थ - जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत व नद्या रहातील तोपर्यंत या जगात रामायणकथा प्रचलित होत राहील.
नंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वाल्मीकी ऋषींनी रामायणाची रचना केली. त्यांना जो शोक झाला होता तोच श्लोकारूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडला
म्हणून म्हटलं आहे की

समाक्षरैश्चतुर्भिर्य: पादैर्गीतो महर्षिणा । सोऽनुव्याहरणाद्भूय: शोक: श्लोकत्वमागत: ॥७५-७॥
अर्थ - सम अक्षरांनी, चार पादांनी, महर्षींनी जो शोक व्यक्त केला तो श्लोकत्वाप्रत आला.
म्हणजे त्याला श्लोकरूप प्राप्त झाले.

आणि तसेच झालेले दिसून येत आहे. इतकी हजार वर्षे लोटली असली तरी आजही रामकथा मोठ्या आवडीने गायिली जाते.

ही रामकथा इतकी प्रसिद्ध झाली की भारतात प्रत्येक प्रादेशिक भाषेत ही कथा पुन्हा पुन्हा गायिली गेली आहे. महाराष्ट्रात नाथांचे भावार्थ रामायण, दक्षिणेत कंब रामायण, उत्तरेत तुलसीदासांचे रामचरितमानस, गुजराथीमधे गिरिधर रामायण अशी अनेक रामायणे प्रसिद्ध आहेत. भारतीय भाषात रामायणे लिहिली गेली असल्यास नवल नाही. संस्कृतमधे सुद्धा पुन्हा पुन्हा रामकथा गायली आहे. त्यात योगवासिष्ठ महारामायण व अध्यात्म रामायण हे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्याव्यतिरिक्त अद्भुत रामायण व आनंद रामायण नावाने सुद्धा दोन रामायणे संस्कृत मधे आहेत.

या सर्व रामायणांना वाल्मीकी रामायण हा मूलाधार आहे. रामकथेची चौकट कायम ठेऊन इतर कवींनी पुन्हा पुन्हा रामायण गायिलेले आहे.

वाल्मीकींचे ‘रामायण’ हे आदिकाव्य लौकिक संस्कृत साहित्यातील पहिले महाकाव्य. म्हणून रामायणाला आदिकाव्य व वाल्मीकींना आदिकवी म्हणतात. हे महाकाव्य जरी वाल्मीकींनी रचलेले असले तरी ते केवळ या महाकाव्याचे कवीच नाहीत तर ते रामायणाचे साक्षीदार आहेत व रामायणात त्यांनी एक महत्वाची भूमिकाही बजावली आहे.

रामायणाची एकूण सात कांडे आहेत. १) बालकांड २) अयोध्याकांड ३) अरण्यकांड ४) किष्किंधाकांड ५) सुंदरकांड ६) युद्धकांड ७) उत्तरकांड

यामधे एकूण श्लोकसंख्या २४००० आहे. म्हणून त्याला चतुर्विंशतिसाहस्री संहिता असेही म्हणतात. किंवा रामांनी रावणाचा वध केला असल्यामुळे याला पौलस्त्यवध असेही नाव आहे.

 आपल्याला वाल्याकोळ्याचा वाल्मीकी झाला ही कथा लहानपणापासून माहीत आहे. पण वाल्मीकी रामायणाच्या उत्तरकांडात स्वत:ची ओळख करून देतांना वाल्मीकी श्रीरामांना म्हणतात -‘प्रचेतसोऽहं दशम: पुत्रो राघवनन्दन’. म्हणजेच ‘हे श्रीरामा, मी प्रचेतसाचा म्हणजे वरुणाचा दहावा मुलगा आहे. तसेच ‘इति संदिश्य बहुशो मुनि: प्राचेतसस्तदा’ असाही एक उल्लेख रामायणात आहे, त्यावरून वाल्मीकी हे वरुणाचे पुत्र होते ही गोष्ट सिद्ध होते. मनुस्मृतीत वाल्मीकी हे वसिष्ठ, नारद व भृगु यांचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. मग हा वाल्या कोळ्याचा वाल्मीकी कधी झाला ? हे कथानक कुठून आले ? तर हे कथानक अध्यात्मरामायणात आलेले आहे. हे कथानक अध्यात्मरामायणाच्या कवीने वाल्मीकींच्या मुखी घातले आहे. पूर्वायुष्यात एक व्याध म्हणून जीवन व्यतीत करत असतांना ऋषिगणांच्या उपदेशानुसार त्यांनी रामनामाचा जप केला व महर्षीपद प्राप्त करून घेतले. या प्रसिद्ध कथानकाला स्कंदपुराणाचा आधार आहे. स्कंद पुराणातील वैशाख महात्म्यात वाल्मीकी हे पूर्वजन्मात व्याध असल्याचे म्हटले आहे. अर्थात पद्मपुराणात ते पूर्वजन्मात व्याध असल्याचे म्हटले आहे तर अध्यात्मरामायणात ते पूर्वायुष्यात व्याध असल्याचे म्हटले आहे.

नारदऋषींनी त्यांना रामनामाचा मंत्र दिला व त्या मंत्राचा जप करण्यास सांगितले. वाल्मीकींनी आपले पूर्वीचे व्याधजीवन सोडून दिले व ते रामनामाचा जप करू लाघले. प्रथम त्यांच्या मुखातून ‘मरा, मरा’ असा उलटा जप होत होता. हे सर्व कथानक आपल्याला माहीतच आहे. अशी नामजपाची त्यांनी बारा वर्षे साधना केली. बारा वर्षानंतर जेव्हा नारद परत आले तेव्हा त्यांना एका वारूळातून रामनामाचा जप ऐकू येत होता. तेव्हा त्यांनी ते वारुळ फोडले व त्यातून वाल्मीकी बाहेर आले. संस्कृतमधे बल्मीक म्हणजे वारुळ. वारुळातून बाहेर आले म्हणून त्यांना वाल्मीकी म्हणतात.

तसेच वनवासात असतांना मारीच राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप घेतले व तो रामाला त्यांच्या कुटीपासून दूर घेऊन गेला. रामांचा बाण लागल्यावर  ‘लक्ष्मणा धाव’ असे रामाच्या आवाजात ओरडला. ते शब्द ऐकून सीतेला राम संकटाट आहे असे वाटले व तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्यास सांगितले. लक्ष्मण नाही म्हणत असता ती त्याला दुर्वचने बोलली व त्याला जाण्यास भाग पाडले. त्यावेळी लक्ष्मण कुटी भोवती एक रेखा आखून जातो व त्या रेघेबाहेर पाऊन न टाकण्याची सीतेला विनंती करतो. हा जो लक्ष्मणरेषेचा कथाभाग येतो, तो सुद्धा वाल्मीकिरामायणात नाही.  एकनाथी रामायणात आहे. त्याअर्थी हे कथानक जनमानसात चालत आलेले असावे. एकूण बाकीच्या कवींनी रामायणकथेची चौकट कायम ठेऊन त्या कथेत विविध रंग भरले आहेत.

योगवासिष्ठ महारामायण

योगवासिष्ठ महारामायणात वसिष्ठांनी वैराग्य प्राप्त झालेल्या रामांना उपदेश केला आहे. या ग्रंथाची ओळख करून देतांना वसिष्ठ दुसर्‍या प्रकरणात म्हणतात की मोक्षाचे उपाय सांगणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. याची वैराग्य, मुमुक्षु-व्यवहार, उत्पत्ती, स्थिती, उपशम व निर्वाण अशी सहा प्रकरणे असून श्लोकसंख्या ३३००० आहे.

अध्यात्मरामायण -

या रामायणाची सुरवात शिव पार्वतीच्या संवादातून झालेली आहे. पार्वतीला राममाहात्म्य मान्य आहे. ‘श्रीरामचन्द्रेऽखिललोकसारे भक्तिर्दृढा नौर्भवति प्रसिद्धा’ अखिललोकसार श्रीरामचंद्रांची भक्ती ही संसारसागर तरून जाण्यास सुदृढ नौका आहे ही गोष्ट तिला माहीत आहे. पण त्यामुळे तिच्या मनात एक शंका उद्भवली की राम परब्रह्म असूनही आपल्याच मायेने आवृत्त झाल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते. त्यासाठी त्यांना वसिष्ठांकडून उपदेश ग्रहण करावा लागला. राम जर आत्मतत्त्व जाणत होते तर त्यांनी सीतेकरता एखद्या सामान्य मानवाप्रमाणे शोक का केला व जर ते आत्मस्वरूप जाणत नव्हते तर त्यांना सामान्य मानवच म्हटले पाहिजे. मग जर ते सामान्य मानव असतील तर त्यांची भक्ती कशाला केली पाहिजे ? या पार्वतीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून शंकरांनी पार्वतीला राम हे परब्रह्मस्वरूप कसे आहेत ते सांगितले.

या रामायणात पावलोपावली अनेक प्रसंगांमधून भक्ती, ज्ञान, उपासना, नीती व सदाचाराविषयी उपदेश केलेला आहे. यात अनेक विषयांचे वर्णन आलेले असले तरी अध्यात्मतत्त्वाचे यात विशेष विवेचन केलेले आहे. म्हणून या रामायणाला अध्यात्म-रामायण असे म्हणतात. भगवान श्रीराम हेच मूर्तिमंत अध्यात्मतत्त्व या रामायणात मानलेले आहे. वाल्मीकींचा राम मानव कोटीतील असून त्याची देवत्वाप्रत वाटचाल झालेली आहे. वाल्मीकींचा आदर्श रामराजा अध्यात्म-रामायणात मात्र प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार म्हणून पृथ्वीतलावर अवतरलेला आहे. तसेच पृथ्वीवरील सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे. स्वत: रामांनीही आपण अवतार असल्याचे या रामायणात वेळोवेळी सांगितले आहे.

वाल्मीकी रामायणातील उपाख्याने व इतर विस्तार वगळून सर्व महत्वाच्या घटना या रामायणात आलेल्या आहेत. त्यामुळे या रामायणाचा विस्तार वाल्मीकि-रामायणापेक्षा खूपच कमी आहे. यात सात कांडे असून एकूण ५० सर्ग आहेत. वाल्मीकि-रामायणाची श्लोकसंख्या २४००० आहे तर या रामायणाची श्लोकसंख्या ४२४८ आहे.

आनंदरामायण

आनंदरामायण हे वाल्मीकिमहामुनिकृत शतकोटीरामचरितांतर्गत संस्कृत भाषेत रचलेले रामायण आहे. अध्यात्मरामायणाप्रमाणे शंकर पार्वतीला हे रामायण सांगत आहेत. परंतु वाल्मीकिरामायण अथवा अध्यात्मरामायणाप्रमाणे यात नेहेमीची सात कांडे नाहीत. या रामायणात एकूण ९ कांडे आहेत. १) सारकांड २) यात्राकांड ३) यागकांड ४) विलासकांड ५) जन्मकांड ६) विवाहकांड ७) राज्यकांड पूर्वार्ध व उत्तरार्ध ८) मनोहर कांड ९) पूर्णकांड

या रामायणात श्रीरामविषयक विविध कथा आलेल्या आहेत. त्याव्यतिरिक्त यात १०८ रामनामे असलेले स्तोत्र, विष्णुस्तोत्र, शिवकृत रामस्तवराजस्तोत्र, पक्षांनी गायिलेले रामस्तोत्र, रामांनी सीतेला देहरामायणाचा केलेला उपदेश आणि रामाने केलेल्या देहरामायणाचा उपदेश सीतेने रामाच्या जीवनाला लाऊन दाखवलेला कथाभाग, रामाच्या मानसपूजेचा विधी, विविध व्रते, हनुमत्कवच, रामकवच, सीताकवच, सीताष्टोत्तरशतनामस्तोत्र, लक्ष्मणकवच, रामरक्षा, भरतकवच, शत्रुघ्नकवच, मनन-कीर्तन करण्यास योग्य राममंत्र, अशी अनेक स्तोत्रेही यात आलेली आहेत. या रामायणाची रचना ९ सर्गात झाली आहे व श्लोकसंख्या १२२९९ आहे.

अद्भुतरामायण

अद्भुतरामायणाची कथा नावाप्रमाणेच अद्भुत आहे.
अद्भुतरामायणाचा प्रारंभच अकल्पित आहे. याचे एकूण २७ सर्ग आहेत. परंतु वाल्मीकींनी सांगितलेली रामकथा फक्त तोंडीलावण्यापुरतीच आहे. कुणाकुणाला मिळालेल्या शापापोटी राम व सीता यांनी जन्म घेतल्याच्या विविध कथा यात आल्या आहेत. यातील कथानकाला एकजिनसीपणा नाही. वाल्मीकी रामायणातील कैकेयीचा दुष्टावा, दशरथाचा मृत्यू, रामांचा वनवास या महत्वाच्या घटनांचा यात उल्लेख सुद्धा नाही. रामलक्ष्मण सीतेसह कोणत्यातरी हेतूने दंडकारण्यात गेल्याचे म्हटले आहे. परशूरामांना विश्वरूपदर्शन, हनुमंताला चतुर्भुजरूपाचे दर्शन, रामांना भव्य ऐश्वर्यशाली देवीस्वरूपाचे दर्शन, हनुमानांना केलेला सांख्य तत्वज्ञान, भक्तियोग, उपनिषदातील तत्वज्ञानाचा उपदेश, यात आला आहे. रावणवध हा यात महत्वाचा नसून सीतेचे रामाच्या जीवनातील स्थान महत्वाचे आहे हे या रामायणाला दाखवायचे आहे. रामांचे सामर्थ्य कमी पडताच उग्ररूप धारण करून तिने रामांचे रक्षण केले आहे व रामांना वरदान दिले आहे. सप्तशतीतील देवीच्या पराक्रमांच्या व अवतारांच्या कथेचा प्रभाव या रामायणातील सीतेच्या पराक्रमावर दिसून येतो. या रामायणातील कथेप्रमाणेच यातील तत्वज्ञानही एकजिनसी नाही. सांख्यतत्वज्ञान, वेदांतातील परमात्मस्वरूपाचे वर्णन किंवा शाक्त तत्वज्ञानही या रामायणात स्पष्टपणे सांगितलेले नाही. एकूण कथानकातील अद्भुताचा अंशच या रामायणात प्रभावी झालेला आहे.

रामायणातील दुसर्‍या अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंत रामाचरिताचे सलग कथानक येते. परंतु पाहिल्या बालकांडात व शेवटच्या उत्तरकांडात इतर कथानके येतात. पहिल्या कांडात विश्वामित्र चरित्र थोडक्याट आले आहे. त्यावरून विद्वानांचे असे मानणे आहे की बालकांडात व उत्तरकांडात प्रक्षिप्त भाग आहे. प्रक्षिप्त मधे प्र + क्षिप् हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे टाकणे, फेकणे. नंतरच्या कवींनी काही कथाभाग त्यात घुसडला असावा. म्हणून त्यांना प्रक्षिप्त असे म्हणतात.

वास्तविक सीतेला सोडवून श्रीराम अयोध्येला परत आल्यानंतर रामायण कथाभाग संपला असे विद्वानांचे मानणे आहे.

वाल्मीकी ऋषींना ब्रह्मदेवाने जो वर दिला की जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत व नद्या आहेत तोपर्यंत रामायणकथा प्रचलित राहील. तो वर अक्षरश: खरा ठरला आहे. 


" संस्कृत साहित्याची ओळख - ४ - रामायण " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Thursday, July 9, 2020

पाठ २४ सुभाषित ६)

नमस्कार.

आज आपण सुभाषिते पहाणार आहोत.
आजची दोन सुभाषिते स्थानमाहात्म्य सांगणारी आहेत आणि सोपीही आहेत.

१) अश्वं शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नरश्च नारी च । पुरुषविशेषं प्राप्ता भवन्ति योग्या अयोग्याश्च ॥२१-१॥

संधिविग्रह - अश्वं शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नर: च नारी च । पुरुषविशेषं प्राप्ता: भवन्ति योग्या: अयोग्या: च

अन्वय -
अर्थ - घोडा, शस्त्र, शास्त्र, वीणा, वाणी, पुरुष व स्त्री या गोष्टी विशेष मनुष्याला प्राप्त झाल्या तरच त्या योग्यता पावतात नाहीतर त्या अयोग्य ठरतात.

११) राजा कुलवधुर्विप्रा मन्त्रिणश्च पयोधरा: । स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता: केशा नखा नरा: ॥२१-११॥

संधिविग्रह -  राजा कुलवधु: विप्रा: मन्त्रिण: च पयोधरा: । स्थानभ्रष्टा: न शोभन्ते दन्ता: केशा: नखा: नरा:

अर्थ - राजा, कुलीन स्त्री, ब्राह्मण, मंत्री, स्तन, दांत, केस, नखे व माणसे स्थानभ्रष्ट झाली तर शॊभून दिसत नाहीत.

९) आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपु: । नास्त्युद्यमसमो बन्धु: कृत्वा यं नावसीदति ॥२८-९॥

संधिविग्रह - आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थ: महान् रिपु: । न अस्ति उद्यमसम: बन्धु: कृत्वा यं न अवसीदति

अन्वय - आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थ: महान् रिपु: (अस्ति) । उद्यमसम: बन्धु: न अस्ति । यं कृत्वा (मनुष्य:) न अवसीदति

अर्थ - आळस हा मनुष्याच्या शरीरात रहाणारा मोठा शत्रू आहे. उद्योगासारखा दुसरा बंधू नाही की जो केला असता मनुष्य़ाचा नाश होत नाही.

कोऽहं कोऽहं जन्म किमर्थं नाहं जानामि
मृत्यो रूपं पञ्चीकरणं कथमवगच्छामि ।
शरणमागता तव शिष्यैषा उपदेशं श्रोतुम्
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन्नज्ञानं हन्तुम् ॥२॥

संधिविग्रह -
क: अहं क: अहं जन्म किमर्थं न अहं जानामि
मृत्यो: रूपं पञ्चीकरणं कथम् अवगच्छामि ।
शरणम् आगता तव शिष्या एषा उपदेशं श्रोतुम्
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन् अज्ञानं हन्तुम्

अन्वय - क: अहं क: अहं, जन्म किमर्थं. अहं न जानामि
मृत्यो: रूपं, पञ्चीकरणं, (अहं) कथम् अवगच्छामि ?
तव एषा शिष्या उपदेशं श्रोतुम् शरणमागता
स्वामिन् जागृहि स्वामिन् जागृहि, अज्ञानं हन्तुम्


अर्थ - मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे, हे मला कळत नाही. मृत्यूचे स्वरूप, पंचीकरण हेही मला समजत नाही. तुमची ही शिष्या उपदेश ऐकण्यासाठी तुम्हाला शरण आलेली आहे. म्हणून आपण आमच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी जागे व्हा.

आकाराम्त स्त्रीलिंगी माला शब्द
माला  माले  माला:        प्रथमा
मालां  माले  माला:        द्वितीया
मालया  मालाभ्यां  मालाभि:  तृतीया
मालायै  मालाभ्यां  मालाभ्य:  चतुर्थी
मालाया: मालाभ्यां  मालाभ्य:  पंचमी
मालाया: मालयो:  मालानां    षष्ठी
मालायां  मालयो:  मालासु    सप्तमी
माले  माले  माला:         संबोधन

" पाठ २४ सुभाषित ६) " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...