Monday, September 28, 2020

पाठ ५९ - विशेषणांनी युक्त पाठ सुभाषितानि


 पाठ ५९ - विशेषणांनी युक्त पाठ        सुभाषितानि

    सुभाषितं नाम शोभनं भाषितम् । संस्कृतभाषायां बहूनि गेयानि सुभाषितानि सन्ति । सुभाषितान्येतानि मधुराणि च । अन्योक्तय: प्रहेलिका:, समस्या: इत्यादय: सुभाषितानां विविधा: प्रकारा: । यद्यप्यल्पाक्षराणि सुभाषितानि तथापि महान्तमर्थं सूचयन्ति तानि ।


    क: अपि सुभाषितकार: वदति, 'विद्याविहीन: पशु:' । अपर: वदति, 'परोपकारार्थमिदं शरीरम्' । कश्चन वदति, 'शीलं परं भूषणम्' । कानिचित् सुभाषितानि सज्जनान् प्रशंसन्ति, कानिचित् दुर्जनान् निन्दन्ति । कानिचित् उद्यमस्य श्रेष्ठत्वं वर्णयन्त्यन्यान्यलसस्य दोषान् कथयन्ति । कानिचित् सुभाषितानि दानस्य माहात्म्यं वर्णयन्ति, अपराणि धनस्यासारत्वं कथयन्ति । एवं सुभाषितानां विषया: भिन्ना: । 


    सुभाषितरसास्वाद: अस्माकं दु:खमपहरति, सुखं वर्धयति अस्मानुपदिशति च । वयं अन्नपदार्थानां सेवनेन क्षणिकां तृप्तिं विन्दाम: । किन्तु सुभाषितरसास्वाद: शाश्वतमानन्दं यच्छति ।


    छात्रै: सुभाषितान्यवश्यं कण्ठस्थीकरणीयानि । उत्कृष्टनिबन्धलेखनार्थं तान्यतीवोपयुक्तानि । सुभाषितानां पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषा च भवति ।


    सत्यमेव एतद् वचनं यत् -

    पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।
    मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥


कठिण शाब्दांचे अर्थ -


नाम - म्हणजे. परम् - श्रेष्ठ. अलस - आळशी मनुष्य. असारत्व - निरर्थकता. वर्धयति - वाढवतो. कण्ठस्थीकरणीयानि - पाठ करावीत. विधीयते - दिली जाते.


प्रश्न १ खालील संधी सोडवा - 


१) सुभाषितान्येतानि २) यद्यप्यल्पाक्षराणि ३) तथापि ४) महान्तमर्थम् ५) परोपकारार्थमिम् ६) वर्णयन्त्यन्यान्यलसस्य ७) धनस्यासारत्म् ८) दु:खमपहरति ९) अस्मानुपदिशति १०) शाश्वतमानन्दम् ११) सुभाषितान्यवश्यम् १२) तान्यतीव १३) जलमन्नम्

   
प्रश्न २ खालील प्रश्नांची उत्तरे द्या -
१) किं नाम सुभाषितम् ?
१) सुभाषितानि कीदृशानि सन्ति ?
३) के सुभाषितानां प्रकारा: ?
४) अल्पाक्षराणि सुभाषितानि किं सूचयन्ति ?
५) सुभाषितानां के विषया: ?
६) क: पशु: ?
७) इदं शरीरं किमर्थम् अस्ति ?
८) किं परं भूषणम् ?
९) सुभाषितानि कान् निन्दन्ति ?
१०) सुभाषितानि कान् प्रशंसन्ति ?
११) सुभाषितानि कस्य श्रेष्ठत्वं वर्णयन्ति ?
१२) सुभाषितानि कस्य दोषान् कथयन्ति ?
१३) सुभाषितानि कस्य माहात्म्यं वर्णयन्ति ?
१४) सुभाषितानि कस्य असारत्वं कथयन्ति ?
१५) सुभाषितरसास्वाद: किं किं करोति ?
१६) वयं क्षणिकां तृप्तिं केन विन्दाम: ?
१७) कै: सुभाषितानि कण्ठस्थीकरणीयानि ?
१८) सुभाषितानाम् क: उपयोग: भवति ?
१९) पृथिव्यां कानि रत्नानि वर्तन्ते ?
२०) मूढा: कानि रत्नानि इति कथयन्ति ?

प्रश्न ३ या पाठातील विशेष्य-विशेषणपदांच्या जोड्या तयार करा. -


सरावासाठी अभ्यास

प्रश्न १ रूपे ओळखा. - 


सुभाषितानि, भाषायाम्, बहूनि, गेयानि, एतानि, अन्योक्तय:, अल्पाक्षराणि, सूचयन्ति, वदति, पशु:, शरीरम्, भूषणम्, सज्जनान्, प्रशंसन्ति, दुर्जनान्, निन्दन्ति, वर्णयन्ति, अन्यानि, अलसस्य, दोषान्, कथयन्ति, दानस्य, धनस्य, अस्माकम्, अपहरति, उपदिशति, पदार्थानाम्, सेवनेन, तृप्तिम्, विन्दाम:, यच्छति, छात्रै:, तानि, पृथिव्याम्, रत्नानि, मूढै:


प्रश्न २ - खालील धातूंचा परस्मैपदी आज्ञार्थ लिहा.

१) गण् (१० उ.प.)
२) तड्-ताड् (१० उ. प.)
३) तुष् (४ प. प.)
४) चल् (१ प. प.)
५) दिश् (६ उ. प.)

संधी सोडवून वाचलत की वाक्याचा अर्थ उलगडत जाईल. हा पाठ समजून सागणारा ऑडिओ मंगळवारी पोस्ट करते. तोपर्यंत एक दिवस तुम्ही स्वतः समजून घेता येतो का त्याचा प्रयत्न करा. स्वध्याय मोठा आहे . चार दिवस आहेत सोडवायला.


या पाठातील आणखी काही कठिण शब्दांचे अर्थ 


अपर = दुसरा
कश्चन = कोणी एक
कानिचित् = काही
विद्-विन्द (६प.) = मिळवणे 

 



" पाठ ५९ - विशेषणांनी युक्त पाठ - सुभाषितानि " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Wednesday, September 23, 2020

पाठ ५८ वा स्वरसंधी भाग ३


पाठ ५८ वा स्वरसंधी भाग ३

पहिल्या दोन भागात आपण स्वरसंधीचे सवर्णांचा दीर्घ संधी, गुणसंधी व वृद्धिसंधी हे तीन प्रकपाहिले. आज चौथा प्रकार पहावयाचा आहे.


४) यण् संधी

व्याकरणात य्, व्, र्, ल्, या वर्णांना यण् असे नाव आहे.

नियम -

पहिल्या पदाच्या अंती ह्रस्व किंवा दीर्घ इ, उ, ऋ, लृ आले व त्यापुढे कोणताही सवर्ण नसलेला विजातीय स्वर आला तर त्या पूर्व स्वराच्या जागी क्रमाने य्, व्, र्, ल् असे आदेश होतात. म्हणजे पूर्वीच्या इ च्या ठिकाणी य्, उ च्या ठिकाणी व्, ऋ च्या ठिकाणी र् व लृ च्या ठिकाणी ल् येईल. आदेश होणार म्हणजे पूर्वीचा वर्ण हटवून त्या जागी नवीन वर्ण स्थानापन्न होणार. येथे फक्त पूर्वीच वर्ण हटवला जाणार आहे. गुण वा वृद्धिसंधी प्रमाणे मागचा व पुढचा स्वर मिळून आदेश होणार नाही. 


काही उदाहरणे पाहूया. 


१) गच्छति + अस्तम्
= गच्छत् + इ + अस्तम्

येथे इ या स्वरापुढे अ हा विजातीय  स्वर आला आहे. इ हाच स्वर आला असता तर दीर्घ संधी झाला असता. थोडक्यात ह्रस्व किंवा दीर्घ इ या स्वरापुढे इ सोडून कोणताही स्वर आला तर यण् असा आदेश होईल. म्हणून इ या वर्णाच्या जागी य् असा आदेश होईल. 


= गच्छत् + य् + अस्तम्
= गच्छत्य् + अस्तम्
= गच्छत्यस्तम्

२) दासी + एव
= दास् + ई + एव 


येथे ई या स्वरापुढे ए हा स्वर आला आहे. म्हणून ई या स्वराला य् असा आदेश होईल.
= दास् + य् + एव
= दास्य् + एव
= दास्येव

३) भवतु + इति
= भवत् + उ + इति

येथे उ या स्वरापुढे इ हा स्वर आला आहे. म्हणून येथे उ या स्वराला व् असा आदेश होईल.

= भवत् + व् + इति
= भवत्व् + इति
= भवत्विति

४) चमू + ऐक्यम्
= चम् + ऊ + ऐक्यम्

येथे ऊ या दीर्घ स्वरापुढे ऐ हा विजातीय स्वर आला आहे. म्हणून ऊ या स्वराला व् असा आदेश होईल.

= चम् + व् + ऐक्यम्
= चम्व् + ऐक्यम्
= चम्वैक्यम्

५) मातृ + उत्सङ्ग: (मांडी)
मात् + ऋ + उत्सङ्ग:

येथे ऋ या स्वरापुढे उ हा स्वर आला आहे. म्हणून ऋ या स्वराला र् असा आदेश होईल.

= मात् + र् + उत्सङ्ग:
= मात्र् + उत्सङ्ग:
= मात्रुत्सङ्ग:
दीर्घ ॠकारान्त शब्द वापरात नाहीत.
६) लृ + आकृतिः


लृ स्वराने अंत पावणारी भाषेत उदाहरणे नाहीत. म्हणून असा संधी घेतला आहे.


येथे लृ या स्वरापुढे आ हा स्वर आला आहे. म्हणून लृया स्वराला ल् असा आदेश होईल. 


= ल् + आकृति:
= लाकृति:

लक्षात ठेवण्याची गोष्ट

इ, उ, ऋ, लृ या स्वरांना य्, व्, र्, ल् असे क्रमाने आदेश होणार आहेत.

प्रश्न १ - खालील संधी सोडवा.
१) भवन्ति + अपेया: =
२) दानेषु + अभयम् =
३) मेधाविनी + आसीत् =
४) इति + उपाधिम् =
५) अपि + अस्ति
६) अति + आवश्यकम् =
७) खलु + आधार: =
८) देवेषु + अपि =
९) इति + अत्र =
१०) इति + एतस्य
११) इति + एव
१२) अपि + अनुभवति

खालील संधी मागील भागावर आहेत.


१) च + इति
२) एव + इति
३) सा + अतीव =
४) सा + अद्य =
५) रूपेण + अमरा =
६) परम + आदरेण =
७) परम + आदरेण =

खालील संधी होतांना मागील पदातील व्यंजनात पुढचा स्वर मिसळून ते व्यंजन पूर्ण होईल.


१) हृदयम् + अपि =
२) सत्यम् + एव =
३) जलम् + अपेयम् =
४) वित्तम् + इति =
५) धनम् + अपि
६) कवीन् + अपि

प्रश्न २ खालील संधी सोडवा.
१) इत्यत्र =
२) चैव =
३) एवाधार: =
४) इत्येतस्य
५) इत्येव =
६) गच्छतेव
७) निवसतीति
८) सदनमुपागच्छत् =
९) खल्वुचितम्
१०) सततमेव =
११) कमपि =
१२) सत्यमेव =
१३) प्रतिपालस्यापेक्षा =
१४) नियोजनमतीव =
१५) स्वल्पमपि =
१६) कार्याण्यवश्यम् =
१७) तस्यापव्यय: =
१८) विद्यामर्थम् =
१९) जीवितमशाश्वतम् =
२०) नितरामावश्यकता =

सरावासाठी अभ्यास 


प्रश्न १ खालील धातू वर्तमानकाळात चालवा.
शंस (१ प. प.), कूर्द (१ आ. प.), कुप् (४ प. प.) युध् (४ आ. प.)

प्रश्न २) - खालील १ ला गण परस्मैपदी धातूंचा आज्ञार्थ लिहा.
वद्, खाद्, धाव्, स्था-तिष्ठ्

प्रश्न ३) कवि शब्द लिहा.
 

" पाठ ५८ वा स्वरसंधी भाग ३ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, September 22, 2020

पाठ ५७ वा पद्यकथा चटका

पाठ  ५७ वा पद्यकथा चटका

आज मी सुभाषिते न देता अनुष्टुभ छंदातील एक श्लोकबद्ध कथा देणार आहे. कथा तीन श्लोकातच सांगितलेली आहे. पण आज ती तुमची तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी फक्त संधी सोडवून दाखवणार आहे व कठिण शब्दांचा अर्थ देणार आहे. संधी सोडवले की श्लोकाची शक्ती थोडी कमी होते. नंतर प्रत्येक श्लोकातील विभक्ती पाहून तुम्ही त्यातील शब्दांची कर्ता, कर्म, क्रियापद अशी विभागणी तुम्ही करून घ्यायची आहे. पाहूया, तुम्हाला कसं जमतय ते.


प्रथम एक श्लोक घेतला की त्यातील क्रियापद शोधून काढायचे. त्यावरून त्या क्रियापदाचा कर्ता शोधायचा. एकदा कर्ता व क्रियापद कळले की त्या अनुरोधाने इतर शब्द समजून घेता येतात. खाली प्रश्न विचारले आहेत. त्या अनुरोधाने सुद्धा तुम्ही कथा समजून घेऊ शकाल. एकदा प्रयत्न करून पहा.


भक्ष्यार्थमेका चटका गृहं विशति कस्यचित् ।
अकस्मादीक्षते तत्र भित्तौ विमलदर्पणम् ॥१॥

स्वबिम्बं दर्पणे तस्मिन् यदाऽऽलोकयते च सा ।
मन्यते चापरा काऽपि चटका वर्तते खलु ॥२॥

प्रहरत्यतिकोपेन चञ्च्वा तस्मिन् हि दर्पणे ।
वारंवारमत: श्रान्ता गता मूर्छां पतत्यध: ॥३॥

कठिण शब्दांचे अर्थ -
चटका = चिमणी, भित्ति = भिंत, अपरा = दुसरी, चञ्चु = चोच, मूर्च्छा = बेशुद्धी, अध: = खाली

संधीविग्रह -
भक्ष्यार्थमेका = भक्ष्यार्थम् + एका
अकस्मादीक्षते = अकस्मात् ईक्षते
यदाऽऽलोकयते = यदा + आलोकयते
चापरा = च + अपरा
काऽपि = का + अपि
प्रहरत्यतिकोपेन = प्रहरति + अतिकोपेन
वारंवारमत: = वारंवारम् + अत:
पतत्यध: = पतति + अध:

खालील प्रश्नांची उत्तरे द्या -

१) चटका कुत्र विशति ?
२) चटका किम् ईक्षाते ?
३) दर्पणं कुत्र अस्ति ?
४) चटका दर्पणे किम् ईक्षते ?
५) स्वप्रतिबिम्बं दृष्ट्वा (पाहून) चटका किं मन्यते ?
६) चटका अतिकोपेन किं करोति ?

रूपे ओळखा -
विशति =
गृहम् =
ईक्षते =
भित्तौ =
आलोकयते =
मन्यते =
प्रहरति =
चञ्च्वा =
मूर्छाम् =
पतति =

सरावासाठी अभ्यास

१) कवि शब्दाची तृतीया विभक्ती आहे -
कविना कविभ्याम् कविभ्य:

त्याप्रमाणे कपि, मुनि, अलि, वह्नि, अग्नि, यति, मणि या शब्दांची तृतीया विभक्ती लिहा.


२) खालील धातूंचा परस्मैपदी वर्तमानकाळ लिहा. धातू दहाव्या गणाचे आहेत.


चुकून कविभिः च्या ऐवजी कविभ्यः टाईप झाले आह, सरावाच्या अभ्यासात.

=============================================

" पाठ ५७ वा पद्यकथा चटका " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, September 21, 2020

पाठ ५६ वा स्वरसंधी भाग २


 पाठ  ५६ वा स्वरसंधी भाग २

मागच्या एका भागात आपण स्वरसंधीचा सवर्णांचा दीर्घ संधी हा एक प्रकार पाहिला होता. सवर्ण म्हणजे ज्या स्वरांचे उच्चारस्थान एकच आहे ते एकमेकांचे सवर्ण झाले. उदा. अ आणि आ दोन्ही स्वरांचा उच्चार कंठातून होतो. म्हणून ते एकमेकांचे सवर्ण झाले. जेव्हा दोन सवर्ण स्वर एकमेकांपुढे येतात तेव्हा त्यांचा दीर्घ संधी होतो. अ वर्ण + अ वर्ण = आ. इ वर्ण + इ वर्ण = ई. उ वर्ण + उ वर्ण = ऊ. ऋ वर्ण + ऋ वर्ण = ॠ



संधी २ - गुणसंधी

व्याकरणात पाणिनीने अ, ए आणि ओ या स्वरांना गुण असे नाव दिले आहे. जेव्हा अ, ए आणि ओ हे स्वर संधी म्हणून येतात तेव्हा त्या संधीला गुणसंधी असे म्हणतात.


नियम -     अ किंवा आ या स्वरांपुढे ह्रस्व किंवा दीर्घ इ, उ, ऋ आणि लृ हे स्वर आल्यास त्या मागील व पुढील असा दोन स्वरांना मिळून गुणादेश होतो. आदेश होतो म्हणजे ते दोन्ही वर्ण हटवून त्या जागी गुण वर्ण येतो. (आदेश: शत्रुवत् असे म्हटले आहे).


उदा. न + इति
= न् + (अ + इ) + ति

येथे न या वर्णातील शेवटच्या अ या स्वरापुढे इ हा वर्ण आला आहे. तेव्हा अ आणि इ या दोन स्वरांचा मिळून गुणसंधी होणार आहे. गुण म्हणजे अ, ए आणि ओ. मग या तीन स्वरातील कोणता वर्ण त्यांच्या ऐवजी येईल ? त्यासाठी आपल्याला या सर्व वर्णांचे उच्चारस्थान पहावे लागेल. अ वर्णाचे उच्चारस्थान आहे कंठ व इ वर्णाचे उच्चारस्थान आहे तालु. तेव्हा गुणा म्हणून जे स्वर येणार आहेत त्या स्वरांपैकी ह्या दोन्ही उच्चारस्थानांचा समावेश होणारा स्वर कोणता ? तर तो ए हा स्वर आहे. गुणा वर्णांपैकी अ चे उच्चारस्थान कंठ आहे. ए चे उच्चारस्थान कंठतालु आहे. तर ओ चे उच्चारस्थान कंठ-ओष्ठ आहे. तेव्हा कंठतालू हे उच्चारस्थान असणारा ए हा वर्ण तेथे गुण म्हणून येईल.


= न् +(अ + इ) + ति
= न् + (ए) + ति
= नेति असा संधी होईल.

परम + ईश्वर: = परमेश्वर:
यथा + इष्टम् = यथेष्टम् अशी याची काही आणखी उदाहरणे झाली.

चन्द्र + उदय:
= च + न्द्र् + (अ + उ) + दय:
आता येथे अ णि उ या वर्णांचा क्रमश: कंठ व ओष्ठ उच्चारस्थान असलेला ओ हा वर्ण संधी म्हणून येईल. 


= च + न्द्र् + (ओ) + दय:
चन्द्रोदय:

देव + ऋषि:
= दे + व् + (अ + ऋ) + षि:

आता येथे अ आणि ऋ यांचे उच्चारस्थान कंठ व मूर्धा हे आहे. गुण वर्णातील ए आणि ओ हे वर्ण येथे येऊ शकणार नाहीत. मग राहिला अ वर्ण. पण ऋ या स्वराच्या मूर्धा स्थानाची जोड देण्याकरता त्याला र् हा वर्ण जोडून अर् असे पाणिनीच्याच एका सूत्रानुसार करून घ्यावे लागते. आता अ आणि ऋ या दोन स्वरांच्या ऐवजी अर् असा गुणादेश होईल.


= दे + व् + (अ + ऋ) + षि:
 = दे + व् + (अर्) + षि:
= देवर्षि:

लृ वर्ण पुढे येऊन होणार्‍या संधीची उदाहरणे भाषेमधे नाहीत. म्हणून उदाहरणादाखल एक संधी सांगितला जातो

तव + लृकार: = तवल्कारः

तसेच दीर्घ ॠ ने सुरु होणाराही शब्द नाही.

थोडक्यात अ किंवा आ या वर्णांपुढे इ-ई हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून ए हा स्वर संधी म्हणून येतो.


अ किंवा आ या वर्णांपुढे उ-ऊ हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून ओ हा स्वर संधी म्हणून येतो.


अ किंवा आ या वर्णांपुढे ऋ-ॠ किंवा लृ हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून अर् किंवा अल् हा आदेश संधी म्हणून येतो.


३) वॄद्धिसंधी

पाणिनी व्याकरणात आ, ऐ आणि औ या स्वरांना वृद्धि असे नाव आहे. जेव्हा आ, ऐ आणि औ हे स्वर संधी म्हणून येतात तेव्हा त्या संधीला वृद्धिसंधी असे म्हणतात.


नियम - पहिल्या पदाच्या अंती अ किंवा आ हे स्वर व पुढे ए किंवा ऐ स्वर आले तर त्या दोन स्वरांच्या ऐवजी त्यांना ऐ असा आदेश होतो, किंवा अ आणि आ या स्वरांच्या पुढे ओ हा स्वर आला तर त्या दोन स्वरांना मिळून औ हा वृद्धिआदेश होतो.


उदा.
तेन + एव
= तेन् + (अ + ए) + व
= तेन् + (ऐ) + व
= तेनैव

न + ऐच्छत्
= न् + (अ + ऐ) + च्छत्
= न् (ऐ) च्छत्
= नैच्छत्

गङ्गा + ओघ:
= गङ्ग् + (आ + ओ) + घ:
= गङ्ग् + (औ) + घ:
= गङ्गौघ:

दिव्या + औषधि:
= दिव्य् + (आ + औ) + षधि:
= दिव्य् + (औ) + षधि:
= दिव्यौषधि:

स्वाध्याय - 


प्रश्न १ खालील संधी करा.
१) सुर + ईश: =
२) तथा + इति =
३) रमा + ईश: =
४) हित + उपदेश: =
५) गङ्गा + उदकम् =
६) महा + ऋषि: =
७) अद्य + एव =
८) तथा + एव =
९) महा + औषधि: =
१०) महा + औषधम्
११) च + इति =
१२) जनसेवा + एव =

प्रश्न २) संधी सोडवा. 


१) शालामिति
२) अहमत्र
३) मकरायापि
४) तस्याहम्
५) हृदयमिच्छति
६) केनाहम्
७) हृदयमपि
८) तथाचरति
९) अद्यावयो:
१०) समाप्तिमगच्छत्
११) विटपमारोहत्तस्यापि
१२) कपिनाहम्
 
प्रश्न ३) संस्कृतमधे भाषांतर करा 


१) सैनिक चोराला काठीने मारतात.
२) स्त्रिया अलंकारांनी शरीर सजवतात.
३) लोक नावेने नदी ओलांडतात.
४) अभिराम धनुष्याने रावणाबरोबर युद्ध करतो
५) राजा राजवाड्यातून लोकांना पहाटो.
६) महेश झाडावर चढतो
७) सूर्यापासून आपण प्रकाश मिळवतो
८) दशरथाचा मुलगा वनात जातो.
९) चंद्राचा प्रकाश आह्लाददायक असतो.
१०) सिंह पर्वतप्रदेशात रहातात.
११) मनुष्याचे रोग अओषधाने नाहीसे होतात.
१२) ज्ञानामुळे सुख मिळते.
१३) लोकांच्या कल्याणासाठी राजा प्रयत्न करतो.
१४) शिष्य गुरूंची सेवा करतो.
१५) मनुष्य गुणांनी शोभून दिसतो.
१६) सज्जन ईश्वराच्या चिंतनात मग्न होतात.
१७) वाघ गवत खात नाही.
१८) पापापासून दु:खे उद्भवतात.
१९) मूर्खांचे ज्ञान वाढत नाही.
२०) उंच झाडावर पक्षी बसतात.

सरावासाठी अभ्यास 


प्रश्न १) माला शब्दाप्रमाणे विद्या शब्द चालवा, लिहून बघा.
प्रश्न २) आत्मनेपदी वर्तमानकाळ लिहा -
१) रम् (१ आ. प.)
२) मन् (४ आ. प.)
३) मृ-म्रिय् (६ आ. प.)
४) मन्त्र् (१०. आ प.) 


आज दोन संधी मुद्दाम एकत्र घेतले. तुलनात्मक कळावं म्हणून.

अ/आ + इ/ई = ए
अ/आ + ए/ऐ = ऐ

अ/आ + उ /ऊ = ओ
अ/आ + ओ/औ = औ

देव + ऋषि = देवर्षि

एवढं सूत्ररूपाने लक्षात ठेवायचे आहे.

====================================

" पाठ ५६ वा स्वरसंधी भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Saturday, September 19, 2020

पाठ ५५ वा - समस्यापूर्तिः


 पाठ ५५ वा - समस्यापूर्ति:

पुरा धारानगर्यां रसिकवर: उदार: भोज: नाम राजा प्रशास्ति स्म । काव्यानुरागिणस्तस्य नैका: आख्यायिका: प्रसिद्धा: ।


पूर्वी धारा नगरीमधे रसिकांमधे श्रेष्ठ, उदार असा भोज नावाचा राजा राज्य करत होता. काव्यावर प्रेम करणार्‍या त्याच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.


एकदा भोजराजा समस्यां उद्घोषयति, 'मृगात् सिंह: पलायते' इति । वनराज: मृगेन्द्र: क्षुद्रं मृगं पश्यति भीत्या च पलायते । अहो विपरीतार्थऽयम् । महता कुतुहलेन महान् श्रोतृगण: अन्येद्यु: राजसभायामुपस्थित: । विभिन्नप्रान्तत: नैके कवयोऽपि अहमहमिकया समस्यां पूरयितुं समायाता: । 


एकदा भोजराजा एक समस्या उद्घोषित करतो की हरिणाला घाबरून सिंह पळून जातो. वनाचा राजा असणारा सिंह क्षुद्र हरिणाला पाहून पळून जातो ! केवढी ही विपरीत गोष्ट ! मोठ्या कुतुहलाने श्रोते दुसर्‍या दिवशी सभेत उपस्थित होतात. वेगवेगळ्या प्रांतांतून अनेक कवी सुद्धा अहमहमिकेने समस्यापूर्ती करण्याकरता (राजवाड्यात) येतात.

प्रथम: कवि: आसनादुत्थाय राजानं प्रणम्य वदति, 'हे धाराधीश, शृणोतु मम समस्यापूर्तिम्' ।
पहिला कवी आसनावरून उठून राजाला नमस्कार करून म्हणतो, “ हे धाराधीश, माझी समस्यापूर्ती ऐकावी.”

असमाने समानत्वं भविता कलहे मम ।
इति मत्वा ध्रुवं मानी मृगात् सिंह: पलायते ॥१॥ 


अर्थ - माझ्या भांडणामधे बरोबरीच्या नसलेल्यांशी माझी बरोबरी सिद्ध होईल (हरिणाशी युद्ध केले तर तो माझ्याशी सामर्थ्याबाबत माझ्याशी बरोबरी करेल) असे मानून मानी सिंह हरणापासून पळून जातो.


जना: तत् काव्यम् आकर्णयन्ति तं च प्रशंसन्ति । 

द्वितीय: कवि: महाभारतकथाया: आधारेण समस्यां पूरयति । 


लोक ते काव्य ऐकतात व त्याची प्रशंसा करतात. दुसरा कवी महाभारतकथेच्या आधाराने समस्यापूर्ती करतो.


तिष्ठार्जुनाद्य संग्रामे त्वां हनिष्याम्यहं शरै: । 

तिष्ठामि कर्ण किं मूढ मृगात् सिंह: पलायते ॥२॥ 


अर्थ - (कर्ण म्हणतो) हे अर्जुना, थांब. मी तुला बाणांनी ठर मारणार आहे. (अर्जुन म्हणतो) हे कर्णा, हा मी थांबलो आहे. हरणाला घाबरून सिंह पळून जातो की काय ?


युद्धे कर्णस्य दर्पयुक्तं वचनं अर्जुन: आकर्णयति तस्मै झटिति प्रत्युत्तरं यच्छति, 'किं मां कातरं मन्यसे ? कच्चिद् मृगं दृष्ट्वा सिंह: पलायते ?' प्रश्नं योजयित्वा कवि: चातुर्यं दर्शयति अर्थपरिवर्तनं च करोति । रसिकेभ्य: नितरां एषा समस्यापूर्ति: रोचते । 


युद्धात कर्णाचे गर्विष्ठपणाचे बोलणे अर्जुन ऐकतो व त्याला ताबडतोप प्रत्युत्तर देतो, “मला काय तू भित्रा समजतोस ? कधी हरिणाला घाबरून सिंह पळून गेला आहे का ?” प्रश्नाची योजना करून कवी चातुर्य दाखवतो व अर्थपरिवर्तन करतो. रसिकांना ही समस्यापूर्ती खूप आवडते.


तृतीय: कवि: उत्तिष्ठति वदति च, 'अहमपि समस्यापूर्तिं करोमि' । 

यदा भोजराजा अनुज्ञां यच्छति तदा तृतीय: कवि: वदति - 


तिसरा कवी उठतो व म्हणतो, 'मी सुद्धा सममस्यापूर्ती करीन. जेव्हा भोजराजा परवानगी देतो, तेव्हा तिसरा कवी म्हणतो -


कस्तूरी जायते कस्मात् को हन्ति करिणां शतम् ।
भीरु: कुर्वीत किं युद्धे मृगात् सिंह: पलायते ॥३॥ 


अर्थ - कस्तूरी कशापासून निर्माण होते ? (कस्तूरीमृगापासून.) शेकडो हत्तींना कोण ठार मारतो ? (सिंह). भित्रा मनुष्य युद्धात काय करतो ? (पळून जातो.)

त्रीषु चरणेषु त्रय: प्रश्ना: । अन्तिमे चरणे तेषां प्रश्नानां उत्तराणि सन्ति । एवं समस्यापूर्तिना श्रोतृवृन्द: संतुष्ट: । प्रसन्न: धाराधीशऽपि सर्वेभ्य: कविभ्य: सम्मानपूर्वकं पारितोषिकाणि यच्छति । 


तीन चरणांमधे तीन प्रश्न आहेत. शेवटच्या चरणात त्यांची उत्तरे आहेत. अशाप्रकारे समस्यापूर्तीने सर्व श्रोतृगण संतुष्ट होतो. प्रसन्न झालेला भोजराजा सम्मानपूर्वक सर्व कवींना पारितोषिके देतो.

============================

 प्रश्न २रा संस्कृतमधे उत्तरे द्या.

१) भोजराजा कुत्र प्रशास्ति स्म ?
पुरा धारानगर्यां रसिकवर: उदार: भोज: नाम राजा प्रशास्ति स्म ।

२) भोजराजस्य कस्मिन् रुचि: अस्ति ?
भोजराजस्य काव्ये रुचि: अस्ति ।

३) भोजराजा कां समस्यां उद्घोषयति ?
भोजराजा समस्यां उद्घोषयति, 'मृगात् सिंह: पलायते' इति ।

४) श्रोतृगण: कुत्र उपस्थित: ?
श्रोतृगण: अन्येद्यु: राजसभायामुपस्थित: ।

५) द्वितीय: कवि: कस्य आधारेण समस्यापूर्तिं करोति ?
द्वितीय: कवि: महाभारतकथाया: आधारेण समस्यां पूरयति ।

६) कर्ण: अर्जुनं किं वदति ?
कर्ण: अर्जुनं वदति, “अर्जुन, तिष्ठ, अद्य संग्रामे त्वां शरै: अहं हनिष्यामि ।

७) अर्जुन: कर्णाय किं प्रत्युत्तरं यच्छाति ?
अर्जुन: प्रत्युत्तरं यच्छति, “कर्ण, तिष्ठामि । मूढ, मृगात् सिंह: किं पलायते ॥२॥

८) कस्तूरी कस्मात् जायते ?
कस्तूरी मृगात् जायते ।

९) करिणां शतं क: हन्ति ?
सिंह: करिणां शतं हन्ति ।

१०) भीरु: युद्धे किं करोति ?
भीरु: युद्धात् पलायते ।
======================================

 

 

" पाठ ५५ वा - समस्यापूर्तिः " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

१०) महान नाटककार भास



१०) महान नाटककार भास

भास हा संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार. संस्कृत साहित्यात उपलब्ध नाटक-परंपरेचा प्रवर्तक भास हा आहे. इतर अनेक कवींप्रमाणेच त्याचे प्रामाणिक चरित्र इतिहासाला ज्ञात नाही. त्यामुळे ह्या कवीचाही काळ काही दंतकथा व बहि:साक्ष प्रमाणांवरच ठरवावा लागतो. 


भासाच्या नाटकात ज्या संस्कृतीचा व आचारविचारांचा समावेश झालेला आहे त्यावरून कोणी त्याला दक्षिणभारतातील त्रावणकोरचा निवासी आहे असे मानतात. तर कोणी त्याच्या नाटकात जे भरतवाक्य येते की त्याचा राजा हिमाचलापासून विन्धाचला पर्यंत एकछत्री शासन करो, त्यावरून कोणी त्याला उत्तरभारतीय ठरवतात. एका दंतकथेप्रमाणे तो धोबी आहे तर दुसर्‍या दंतकथेप्रमाणे तो कवी घटकर्पराचा ग्रामवासी आहे. एक दंतकथा सांगते की भास व व्यास ह्यांच्यामधे प्रतिष्ठेच्या प्रश्नावरून भांडण झाले. तेव्हा त्यांच्यात श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी दोघांचे ग्रंथ अग्नीत टाकले गेले. परंतु अग्नीने ते जाळले नाहीत. विशेषत: भासाचे 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक त्या अग्नीत जसेच्या तसे राहिले. एकूण ह्या दंतकथेवरून कवी भास हा श्रेष्ठ नाटककार होता व स्वप्नवासवदत्तम् ही त्याची श्रेष्ठ कलाकृती होती असे दिसते. नाटककार भासाचे अभ्यासक श्री पुसाळकर यांच्या मतानुसार भास हा धर्मभीरु ब्राह्मण होता व तो उत्तरभारतातील निवासी होता. एकूण भासाच्या प्रामाणिक चरित्राविषयी अभ्यासकांमधे मतभेद आहेत. 


जी अवस्था चरित्राविषयीची आहे तीच अवस्था त्याच्या काळासंबंधीही आहे. इतिहासकार त्याला इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. से सहावे शतक या काळात केव्हातरी भास झाला असे मानतात. दंडी सहाव्या शतकात होऊन गेला त्याने भासाची प्रशंसा केली आहे. त्याअर्थी त्यापूर्वी भास होऊन गेला. ही त्याची उत्तरसीमा झाली. शूद्रकाचे मृच्छकटिक नाटकावर भासाच्या चारुदत्त नाटकाची छाप आहे. शूद्रक इ. स. च्या तिसर्‍या किंवा चौथ्या शतकात होऊन गेला. म्हणजे भास त्यापूर्वी होऊन गेला. कालिदासाने त्याला असामान्य महाकवी म्हटले आहे. म्हणजे तो कालिदासाच्या पूर्वी होऊन गेला असला पाहिजे. कालिदास इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. चे सहावे शतक अशा कालिदासाच्या कालाविषयी सुद्धा मतभेद आहेत. वाचस्पती गैरोलांनी कालिदासाचा काळ इ. स. पूर्व पहिले शतक असा सिद्ध केला आहे. त्याअर्थी भास हा इ. स. पूर्व पहिल्या शतकाच्या आधी होऊन गेला असावा.  

 

भासाचा वर्णव्यवस्था, यज्ञ-पूजा-प्रार्थना, गोपूजन यावर विश्वास आहे. त्याच्या नाटकांवरून त्याला कोणत्या तरी राजाचा आश्रय मिळालेला असावा असं दिसून येतं. राजघराण्यातील प्रचलित रीतीरिवाजांची त्याला पूर्ण माहिती आहे. नम्र स्वभाव, हजरजबाबी, विनोदप्रिय, इत्यादी गुणांनी तो युक्त होता, असे त्याच्या साहित्यावरून दिसून येते. 


भासाचा उल्लेख मालविकाग्नी नाटकात कालिदासाने केलेला आहे. त्यावरून तो कालिदासापूर्वी होऊन गेला. कालिदासानंतर बाण (इ. स. ६५०), दण्डी (इ. स. ७००) वाक्पतिराज (इ. स. ७५०), व राजशेखर (इ. स. ९००), 'प्रसन्नराघव' नाटकाचा रचयिता कवी जयदेव (इ. स. १२००) यांनी भासाचे एक श्रेष्ठ नाटककार म्हणून स्मरण केले आहे व भासाचे 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक अग्निपरीक्षेतून खरे उतरले याचाही उल्लेख केला आहे. तसेच काव्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणार्‍या दंडी, भामह, वामन, अभिनवगुप्त यांनी भासाच्या नाटकातील श्लोक उदाहरणे म्हणून दिलेले आहेत. अर्थातच राजशेखरापर्यंत कवी भासाची नाटके उपलब्ध असली पाहिजेत. राजशेखराने 'भासनाटकचक्रम्' असे म्हणून त्याने अनेक नाटके लिहिली होती असा उल्लेख केला आहे. अभिनवगुप्त (इ. स. १०००), भोजदेव (इ. स. ११००), सर्वानंद (इ. स. ११५९) रामचन्द्र गुणभद्र (इ. स. १२००) शारदातनय (इ. स. १२००) या सर्वांनी भासाच्या 'स्वप्नवासवदत्तम्' नाटकाचा केवळ उल्लेखच नाही तर त्याच्या वैशिष्ट्यांची पण चर्चा केली आहे. 


परंतु त्यानंतर मात्र त्याने लिहिलेली नाटके लिखित स्वरूपात मिळत नव्हती. त्यावेळचा काळही परकीय आक्रमणांचा होता. त्यामुळे त्याची नाटके काळाच्या ओघात नष्टही झालेली असावीत असा विद्वानांचा कयास होता. परंतु १९१२ मधे टी. गणपति शास्त्री यांना दक्षिणभारतात १३ नाटके असलेले एक हस्तलिखित बाड मिळाले. त्यात 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक होते. स्वप्नवासवदत्तम् हे नाटक व भास ह्यांचे समीकरण जुळले. त्याअर्थी गणपतिशास्त्री यांना मिळालेली नाटके भासाची असली पाहिजेत असे म्हणता येते. नंतर त्या सापडलेल्या सर्व नाटकांची भाषा, त्यांचे अंतरंग परीक्षण करून ती सर्व नाटके भासाची आहेत असे विद्वानांनी ठरवले. अर्थात त्या सिद्धांताला विरोध करणारीही मंडळी आहेतच. 


टी. गणपती शास्त्री यांना भासाने लिहिलेली एकंदर १३ नाटके सापडली. त्यातील सात नाटके महाभारतावर आधारित, दोन नाटके रामायणावर आधारित, दोन नाटके उदयन राजाशी संबंधित आहेत तर दोन नाटकांना परंपरागत आख्यायिकांचा आधार आहे. स्वप्नवासवदत्तम्, प्रतिज्ञायौगन्धरायणम्, प्रतिमा, पञ्चरात्रम्, अभिषेकम्, मध्यमव्याय़ोगम्, कर्णभारम्, दूतवाक्यम्, घटोत्कचम्, उरुभंगम्, बालचरितम्, अविमारकम्, चारुदत्तम् अशी त्याची तेरा नाटके आहेत असे गणपती शास्त्रींनी शोधून काढले आहे.


रामायण, महाभारतादी ग्रंथावर आधारित ही नाटके असली तरी भासाने त्यात पर्याप्त बदल केलेले आहेत. भासाच्या नाटकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो रामायण अथवा महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण करतांना दिसतो. उदा. रामायणावर आधारित प्रतिमा नाटकामधे त्याने कैकयीचे उदात्तीकरण केले आहे. भरत जेव्हा कैकेयीला 'तू रामाला वनात का पाठवलेस' असे विचारतो त्यावेळी कैकेयी उत्तर देते की, 'दशरथांना पितृवियोगाने मृत्यू येईल असा शाप होता. तेव्हा दोन मृत्यू टाळण्यासाठी मी रामाला वनात धाडले.' पुन्हा भरत तिला विचारतो की रामालाच का वनात पाठवलेस ? मला का नाही पाठवलेस ? तेव्हा कैकेयी सांगते की तू आधीच मामाकडे गेलेला होतास. त्यामुळे तुझ्या वियोगाने दशरथांना इतके दु:ख झाले नसते की जेवढे रामाच्या वियोगाने झाले असते.' कैकेयीने सांगितलेली कारणेही अगदी समर्पक आहेत. अशा प्रकारे खलपात्रे ही खलपात्रे नसून ती मूलत: चांगलीच आहेत असे दाखवण्याचा त्याचा हेतू आहे. 


भरतमुनींनी नाटक, ईहामृग, प्रकरण, अङ्क, व्यायोग, समवकार वगैरे दशरूपकाचे जे दहा प्रकार सांगितले आहेत त्या सर्व प्रकारात भासाची नाटके उपलब्ध होतात.

.

दूतवाक्यम् हे एक अंकी नाटक महाभारतातील श्रीकृष्ण-शिष्टाईवर आधारित आहे. तर कर्णभारम् परशुरामांनी कर्णाला दिलेल्या शापावर आधारित असणारे एक अंकी नाटक आहे. दूतघटोत्कच, नाटक महाभारतातील घटोत्कचाने केलेल्या युद्धावरच आधारित एक अंकी नाटक आहे. तर उरुभंगम् सुद्धा एक अंकी नाटक भीम दुर्योधनाची मांडी फोडतो त्या प्रसंगावर आधारित आहे. मध्यमव्यायोगम् या एक अंकी नाटाकामधे भीम एका ब्राह्मणपुत्राचे संरक्षण करतो त्यावर आधारित आहे. 


पंचरात्रम् हे तीन अंकी नाटक आहे. या नाटकामधे जरी दुर्योधन, द्रोण, पांडव ही महाभारतातील पात्रे असली तरी त्यातील कथानकाला महाभारतातील कथेचा आधार नाही. एका यज्ञाच्या निमित्ताने दुर्योधन द्रोणाचार्यांना दानस्वरूपात काही देऊ इच्छितो. त्यावेळी द्रोण त्याला पांडवांना अर्धे राज्य देण्याची विनंती करतात. तेव्हा दुर्योधन सांगतो की अज्ञातवासात असणारे पांडव जर पाच रात्रींमधे आपल्याला सापडले तर मी त्यांना त्यांचे अर्धे राज्य देईन. तेव्हा द्रोणाचार्यांच्या प्रयत्नांनी दुर्योधनाला विराटानगरात अज्ञातवासात असलेले पांडव सापडतात व तो त्यांना अर्धे राज्य देतो असं याचं कथानक आहे..  


बालचरित हे सात अंकी नाटक आहे. या नाटकात कृष्णजन्मापासून कंसवधापर्यंतचे कथानक आलेले आहे. 


अभिषेक हे सहा अंकी नाटक आहे. या नाटकात रामाचा राज्याभिषेक हा विषय आहे. 


अविमारक हे सहा अंकी नाटक आहे. या नाटकात कुन्तिभोज राजाची मुलगी कुरंगी व महाराज सौवीरचा मुलगा अविमारक यांच्या प्रेमकथेचे वर्णन केली आहे. 


प्रतिमा नाटकात रामाच्या वनवासापासून रावणवधा पर्यंतच्या घटना वर्णन केल्या आहेत. हे सात अंकी सर्वांगसंपूर्ण नाटक आहे. रामाच्या वनवासापासून रावणवधापर्यंतचे कथानक यात वर्णिले आहे. याट कैकेयीचे उदात्तीकरण केले आहे. 


प्रतिज्ञायौगन्धरायण हे नाटक सहा अंकी आहे. यात वत्सराज उदयन व वासवदत्ता यांच्या विवावाहाची कथा रहस्यमय रीत्या वर्णन केली आहे. 


स्वप्नवासवदत्त हे सात अंकी नाटक आहे. या नाटकात सुद्धा उदयन-वासवदत्ता यांचे कथानक आहे. प्रतिज्ञायौगन्धरायण नाटकाचा हा उत्तरार्ध आहे. 


चारुदत्त हे चार अंकी प्रकरण नाटक आहे. चारुदत्त व वसंतसेना यांच्या प्रेमाची कल्पित लोककथा यात वर्णन केली आहे. असं म्हटलं जातं की हे नाटक पूर्ण करण्याअगोदरच भासाचे निधन झाले. तेव्हा मग शूद्रक नावाच्या नाटाककाराने 'मृच्छकटिक' नावाचे नाटक याच कथानकावर रचले. 

 
भासाच्या नाटकाची वैशिष्ट्ये -

भासाची नाटके प्रभावी आहेत. त्याच्या नाटकात सुंदर लोकोक्तींचा वापर असतो. त्याच्या नाटकात सर्व रस कमीअधिक प्रमाणात असतात. प्रसादगुण, माधुर्य, सरल सुगम भाषा त्याच्या नाटकात पहायला मिळते. भासाच्या नाटकात अनेक पात्रे असतात. पण ती कोणतेही पात्र निरर्थक नसते. तसेच त्याच्या नाटकातील पात्रे समाजातील विभिन्न स्तरातील असतात. तो खलपात्रांचे उदात्तीकरण करतो; अशी त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. 


 

Wednesday, September 16, 2020

पाठ ५४ वा स्वरसंधी भाग १)


पाठ ५४ वा स्वरसंधी भाग १)

काल व परवा थोडा गृहपाठ जास्त होता. म्हणून आज मी फार थोडा भाग शिकवणार आहे. आजपासून आपण अधून मधून संधींचा विचार करणार आहोत.


संस्कृतभाषेमधे स्वरान्त, व्यजनान्त व विसर्गाने अंत पावणारे असे तीन प्रकारचे शब्द असल्यामुळे संधी सुद्धा तीन प्रकारचे होतात. १) स्वरसंधी २) व्यंजनसंधी ३) विसर्गसंधी


आजपासून आपण स्वरसंधी पहाणार आहोत. स्वरसंधींचे एकूण आठ प्रकार आहेत.

१) सवर्णांचा दीर्घ संधी २) गुणसंधी. ३) वृद्धिसंधी. ४) यण् संधी ५) अयवायाव संधी ६) पूर्वरूप संधी. ७) पररूपसंधी ८) प्रकृतिभाव

१) सवर्णांचा दीर्घ संधी - ज्या स्वरांचे उच्चारस्थान एकच असते, ते परस्परांचे सवर्ण स्वर होतात. उदा. अ, आ या दोन्ही स्वरांचे कंठ हे एकच उच्चारस्थान आहे. त्यामुळे ते एकमेकांचे सर्वर्ण आहेत. त्याप्रमाणेच इ-ई, उ-ऊ, ऋ-ॠ हे एकमेकांचे सर्वर्णस्वर झाले.

पहिल्या पदाच्या अंती ह्रस्व किंवा दीर्घ अ, इ, उ, ऋ हे स्वर व त्याच्या पुढे ह्रस्व किंवा दीर्घ सवर्ण आला तर त्या दोन्ही स्वरांच्या बद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर येतो. 


अ + अ = आ
अ + आ = आ
आ + अ = आ
आ + आ = आ
उदा.
तव + आसनम्
= त + व् + (अ + आ) + सनम्
= त + व् (आ) + सनम्
= तवासनम्

इ किंवा ई + इ किंवा ई = ई
उदा. पठामि + इदानीम्
= पठाम् + (इ + इ) दानीम्
= पठाम् + (ई) + दानीम्
= पठामीदानीम्

उ किंवा ऊ + उ किंवा ऊ = ऊ
साधु + उक्ति:
= साध् + (उ + उ) क्ति:
= साध् + (ऊ) क्ति:
साधूक्ति:

ऋ किंवा ॠ + ऋ किंवा ॠ = ॠ
पितृ + ऋण
= पित् + (ऋ + ऋ) ण
= पित् (ॠ) ण
= पितॄण

प्रश्न १) खालील संधी करा 


१) तत्र + अस्ति २) माला + अधिपस्य ३) आगता + आर्या ४) प्रसीदति + ईश: ५) दासी + इच्छति ६) नारी + ईक्षते ७) साधु + उक्तम् ८) च + अपि ९) रामस्य + अपि १०) न + अपनयति ११) विना + अस्माकम् १२) नृपस्य + आदेश: १३) अथ + अमात्य: १४) न + अवगच्छतु १५) इति + ईश: १६) इच्छन्ति + इति १७) भवति + इति १८) गच्छति + ईश्वर: १९) खलु + उत्साह: २०) ननु + उपयोग: २१० साधु + उत्तरितम् २२) यस्य + अस्ति २३) न + अश्नाति २४) तथा + अपि २५) न + अस्ति

====================================

५४ पाठ स्वरसंधी भाग १) उत्तरे

प्रश्न १) खालील संधी करा
१) तत्र + अस्ति = तत्रास्ति
२) माला + अधिपस्य = मालाधिपस्य
३) आगता + आर्या = आगतार्या
४) प्रसीदति + ईश: = प्रसीदतीश:
५) दासी + इच्छति = दासीच्छति
६) नारी + ईक्षते = नारीक्षते
७) साधु + उक्तम् = साधूक्तम्
८) च + अपि = चापि
९) रामस्य + अपि = रामस्यापि
१०) न + अपनयति = नापनयति
११) विना + अस्माकम् = विनास्माकम्
१२) नृपस्य + आदेश: = नृपस्यादेश:
१३) अथ + अमात्य: = अथामात्य:
१४) न + अवगच्छतु = नावगच्छतु
१५) इति + ईश: =  इतीश:
१६) इच्छन्ति + इति = इच्छन्तीति
१७) भवति + इति = भवतीति
१८) गच्छति + ईश्वर: = गच्छतीश्वर:
१९) खलु + उत्साह: = खलूत्साह:
२०) ननु + उपयोग: = ननूपयोग:
२१) साधु + उत्तरितम् = साधूत्तरितम्
२२) यस्य + अस्ति = यस्यास्ति
२३) न + अश्नाति = नाश्नाति
२४) तथा + अपि = तथापि
२५) न + अस्ति = नास्ति 

======================================

Tuesday, September 15, 2020

पाठ ५३ वा सुभाषित परस्मैपदी आज्ञार्थ


पाठ ५३ वा सुभाषित परस्मैपदी आज्ञार्थ

१) काले वर्षतु पर्जन्य: पृथिवी सस्यशालिनी ।
देशोऽयं क्षोभरहित: सज्जना: सन्तु निर्भया: ॥

संधिविग्रह - 


काले वर्षतु पर्जन्य: पृथिवी सस्यशालिनी ।
देश: अयं क्षोभरहित: सज्जना: सन्तु निर्भया: ॥

अन्वय - काले पर्जन्य: वर्षतु पृथिवी सस्यशालिनी (भवतु) ।
देश: अयं क्षोभरहित: (भवतु) । सज्जना: निर्भया: सन्तु ।

अर्थ - योग्य वेळी पाऊस पडो. पृथ्वी धान्याने शोभून दिसो. हा देश क्षोभरहीत असू दे व सज्जन निर्भय होवोत.

२) सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु ।
सर्व: काममवाप्नोतु सर्व: सर्वत्र नन्दतु ॥

संधिविग्रह - सर्व: तरतु दुर्गाणि सर्व: भद्राणि पश्यतु ।*
। सर्व: काम् अवाप्नोतु सर्व: सर्वत्र नन्दतु ॥

अन्वय - सर्व: दुर्गाणि तरतु।  सर्व: भद्राणि पश्यतु । सर्व: कामं अवाप्नोतु । सर्व: सर्वत्र नन्दतु ॥

 अर्थ - सर्वलोक संकटांच्या पार जाऊ देत. सर्व लोक मंगलदायक गोष्टी पाहोत, सर्वांच्या इच्छा पूर्ण होवोत, सर्व लोक आनंदात राहोत.


३) परोपकारशून्यस्य धिङ्मनुष्यस्य जीवितम् ।
जीवन्तु पशव: येषां चर्माप्युपकरिष्यति ॥

संधिविग्रह - परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् । जीवन्तु पशव: येषां चर्म अपि उपकरिष्यति ॥

विग्रह - परोपकारशून्यस्य मनुष्यस्य जीवितम् धिक् । येषां चर्म अपि उपकरिष्यति (ते) पशव: जीवन्तु ॥

धिक् या अव्ययाला द्वितीया विभक्ती लागते. चर्मन् (नपुंसकलिंगी) = कातडे

अर्थ - परोपकारशून्य मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे. ज्यांचे कातडे सुद्धा उपयोगी पडते ते पशूच जगोत.

४) निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा
 न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा: ॥(नी.श.)

संधिविग्रह - निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तुवन्तु*
*लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ।
*अद्य एव वा मरणम् अस्तु युगान्तरे वा
 *न्याय्यात् पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा: ॥

विग्रह - नीतिनिपुणा: निन्दन्तु यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी: समाविशतु वा यथेष्टम् गच्छतु ।
अद्य एव वा मरणम् अस्तु युगान्तरे वा
 *धीरा: न्याय्यात् पथ: पदं न प्रविचलन्ति ॥

अर्थ - नीतिनिपुण लोक निंदा करोत वा स्तुती करोत, लक्ष्मी घरात प्रवेश करो अथवा तिच्या इच्छेप्रमाणे खुशाल निघून जावो, मरण आजच येवो किंवा कालांतराने (दुसर्‍या युगात) येवो न्याय्य मार्गापासून धैर्यवान लोक एक पाऊल सुद्धा ढळत नाहीत.


५) जातिर्यातु रसातलं गुणगणस्तस्याप्यधो गच्छतु
शीलं शैलतटात् पतत्वभिजन: सन्दह्यतां वह्निना ।
शौर्ये वैरिणि वज्रमाशु निपतत्त्वर्थोऽस्तु न: केवलं
येनैकेन विना गुणास्तृणलवप्राया: समस्ता इमे ॥ (नी.श.)

संधिविग्रह - जाति: यातु रसातलं गुणगण: तस्य अपि अध: गच्छतु
शीलं शैलतटात् पततु अभिजन: सन्दह्यतां वह्निना ।
शौर्ये वैरिणि वज्रम् आशु निपततु अर्थ: अस्तु न: केवलं
*येन एकेन विना गुणा: तृणलवप्राया: समस्ता: इमे

विग्रह - जाति: रसातलं यातु । गुणगण: तस्य अपि अध: गच्छतु ।
शीलं शैलतटात् पततु । अभिजन: वह्निना सन्दह्यताम् ।
वैरिणि शौर्ये वज्रम् आशु निपततु । येन एकेन विना इमे समस्ता: गुणा: तृणलवप्राया:, (स:) अर्थ: न: केवलं अस्तु ।


अर्थ - जात पाताळात जावो, गुणसमूह त्याच्याही खाली जावो. चारित्र्य पर्वताच्या कड्यावरून पडो. वंश अग्नीकडून जाळला जावो. शत्रूप्रमाणे असलेल्या शौर्यावर ताबडतोप वज्र पडो. ज्या एका द्रव्याशिवाय हे सर्व गुण जवळ जवळ कस्पटासारखे होतात ते द्रव्य फक्त आमच्याजवळ असो.


स्वाध्याय - 


प्रश्न १ ला खालील रूपे ओळखा -
उदा.
१) वर्षतु - वृष्-वर्ष् (१ प. प.) आज्ञार्थ द्वि. पु. ए. व.
२) काले - काल (अकारान्त पुं.) स. ए. व.

पृथिवी, सन्तु, तरतु, दुर्गाणि, पश्यतु, नन्दतु, जीवितम्, जीवन्तु, येषां, निन्दन्तु, समाविशतु, गच्छतु, प्रविचलन्ति, शैलतटात्, निपततु, वह्निना, शौर्ये, न:, इमे, सर्व:

प्रश्न २ कंसातील शब्दाचे योग्य ते रूप वापरा. -
 
१)  पर्जन्य: ---- वर्षतु । (समय)
२) पृथिवी सस्यशालिनी ---- (भू-भव् धातूचा आज्ञार्थ वापरा.)
३) सज्जना: निर्भया: ---- । (भू-भव् धातूचा आज्ञार्थ वापरा.)
४) सर्वे दुर्गाणि --- । (तृ-तर् धातूचा आज्ञार्थ वापरा)
५) सर्वे भद्राणि ---- । दृश्-पश्य् धातूचा वर्तमानकाळ वापरा)
६) सर्वे ---- नन्दन्तु । (जन)
७) हे सागर ते --- धिक् । (गर्जित)
८) पशव: जीवन्तु । (वाक्य एकवचनी करा)
९) नीतिनिपुणा: निन्दन्तु । (वाक्य वर्तमानकाळी करा).
१०) धीरा: ---- ---- पदं न प्रविचलन्ति । (न्याय्य, मार्ग)
११) शीलं --- पततु । (गिरि)
१२) --- विना गुणा: तृणलवप्राया: सन्ति । (धन)

========================================

" पाठ ५३ वा सुभाषित परस्मैपदी आज्ञार्थ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, September 14, 2020

पाठ ५२ वा द्वितीया विभक्ती परस्मैपदी आज्ञार्थ


पाठ ५२ वा द्वितीया विभक्ती परस्मैपदी आज्ञार्थ

काल आपण सामान्यपणे संस्कृतमधे वापरल्या जाणार्‍या काळांची व आज्ञार्थ वगैरे अर्थांची माहिती घेतली. आज मी तुम्हांला परस्मैपदी आज्ञार्थाचे प्रत्यय सांगणार आहे.

 
परस्मैपदी आज्ञार्थ  


आनि   आव   आम  प्रथम पुरुष
-      तम्    त   द्वितीय पुरुष
तु     ताम्   अन्तु   तृतीय पुरुष.

धातूचे अंग बनवण्याची रीत नेहेमीसारखीच असते. आपण नम् = नमस्कार करणे या धातूचा आज्ञार्थी रूपे पाहूया.

नम् + अ = नम (धातूचे अंग)

नमानि   नमाव   नमाम   प्रथम पुरुष
नम     नमतम्   नमत   द्वितीय पुरुष
नमतु    नमताम्    क् नमन्तु  तृतीय पुरुष

अहं नमानि । आवां नमाव । वयं नमाम ।
त्वं नम ।  युवां नमतम् । यूयं नमत ।
सा नमतु । ते नमत: । ता: नमन्ति ।

श्रीरामचरितम् ।

ADD IMAGES TO FOLLOWING : 


श्रीरामचरितम् ।

१) दशरथ: अयोध्याया: राजा । कौसल्या, सुमित्रा कैकेयी च तस्य तिस्र: भार्या: । दशरथ: रामस्य पिता । अत: राम: दाशरथि: इति नाम्ना प्रसिद्ध: । कौसल्या तस्य माता । लक्ष्मण:, भरत: शत्रुघ्न: च तस्य भ्रातर: । 


२) दशरथ: श्रीरामं युवराजपदं दातुम् इच्छति । तदा कैकेयी दशरथाय कथयति, “मम पुत्र: भरत: युवराजपदं भूषयतु । श्रीराम: च वनं गच्छतु । एतान् वरान् मे प्रयच्छ” इति । एतेन दशरथ: खिद्यते । स: भाषते, “अन्यत् किमपि वरय । श्रीरामेण विना नाहं जीवामि । अत: श्रीराम: वनं मा गच्छतु” इति । तदा स्वयं श्रीराम: भाषते, “तात, नाहं अभिलषामि युवराजपदम् । पालयानि तवाज्ञाम् । अद्यैव वनं गच्छामि” इति ।


३) तत: श्रीरामेण सह सीता लक्ष्मण: च वनं प्रतिष्ठेते । तदा प्रजाजना: श्रीरामं प्रार्थयन्ते, “श्रीराम, वनं मा गच्छ” इति । तदा श्रीराम: जनान् वदति, “भो: जना:, जनकस्य आज्ञापालनं मम कर्तव्यम् । नाहं गणयानि युवराजपदम् । मम वनगमनेन प्रसरतु रघुवंशस्य कीर्ति: । यूयं सर्वे गृहं गच्छत कैकेयीं च मा निन्दत” इति ।


४) श्रीराम: वनं गच्छति । तत्र रावण: सीतां अपहरति ।

५) तत: क्रुद्ध: श्रीराम: वानराणां साहाय्येन रावणादीन् पराजयते, लङ्कां विजयते बिभीषणं भाषते च, “त्वं एव लङ्कां पालय । नाहं स्पृहये तव राज्याय” इति ।


६) तत: अयोध्यां श्रीराम: सीतया लक्ष्मणेन च सह प्रत्यागच्छति । अनन्तरं लोकानां समाधानार्थं विशुद्धाम् अपि सीतां वने विसृजति ।


प्रश्न १ - या पाठाचे मराठीत भाषांतर करा.

प्रश्न २ - खालील प्रश्नांची संस्कृतमधे उत्तरे द्या.


    १) श्रीरामस्य के भ्रातर: ?     
    २) कैकेयी किं वरं वरयति ?
    ३) दशरथ: कैकेयीं किं भणति ?   
    ४) श्रीराम: केन सह वनं गच्छति ?
    ५) श्रीराम: जनान् किं वदति ?
    ६) श्रीराम: बिभीषणं किं भाषते ?
    ७) श्रीराम: कथम् अस्ति ?

या पाठात ऋकारान्त मातृ, पितृ, भ्रातृ वगैरे शब्द वापरलेले आहेत.

======================================

५२ पाठ (उत्तरे) परस्मैपदी आज्ञार्थ

१) दशरथ: अयोध्याया: राजा । कौसल्या, सुमित्रा कैकेयी च तस्य तिस्र: भार्या: । दशरथ: रामस्य पिता । अत: राम: दाशरथि: इति नाम्ना प्रसिद्ध: । कौसल्या तस्य माता । लक्ष्मण:, भरत: शत्रुघ्न: च तस्य भ्रातर: ।


भाषांतर - दशरथ हा अयोध्येचा राजा होता. कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या त्याच्या तीन पत्नी होत्या. दशरथ हे रामाचे वडील. म्हणून तो दाशरथी अशाही नावाने प्रसिद्ध आहे. कौसल्या ही त्याची आई. लक्ष्मण, भरत व शत्रुध्न हे त्याचे भाऊ आहेत.


२) दशरथ: श्रीरामं युवराजपदं दातुम् इच्छति । तदा कैकेयी दशरथाय कथयति, “मम पुत्र: भरत: युवराजपदं भूषयतु । श्रीराम: च वनं गच्छतु । एतान् वरान् मे प्रयच्छ” इति । एतेन दशरथ: खिद्यते । स: भाषते, “अन्यत् किमपि वरय । श्रीरामेण विना नाहं जीवामि । अत: श्रीराम: वनं मा गच्छतु” इति । तदा स्वयं श्रीराम: भाषते, “तात, नाहं अभिलषामि युवराजपदम् । पालयानि तवाज्ञाम् । अद्यैव वनं गच्छामि” इति । 


भाषांतर - दशरथ श्रीरामांना युवराजपद देऊ इच्छितो. तेव्हा कैकेयी दशरथाला म्हणते, “माझा पुत्र भरत युवराजपद भूषवो. श्रीराम वनामधे जावो. हे वर तुम्ही मला द्या.” यामुळे दशरथ खिन्न होतो. तो (कैकेयीला) म्हणतो, “दुसरा कोणता तरी वर माग. श्रीरामाशिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा श्रीरामाने वनात जाऊ नये.” तेव्हा श्रीराम स्वत:च म्हणतो, “बाबा, मी युवराजपद इच्छित नाही. आपल्या आज्ञेचे मी पालन करतो. आजच वनात जातो.”


३) तत: श्रीरामेण सह सीता लक्ष्मण: च वनं प्रतिष्ठेते । तदा प्रजाजना: श्रीरामं प्रार्थयन्ते, “श्रीराम, वनं मा गच्छ” इति । तदा श्रीराम: जनान् वदति, “भो: जना:, जनकस्य आज्ञापालनं मम कर्तव्यम् । नाहं गणयानि युवराजपदम् । मम वनगमनेन प्रसरतु रघुवंशस्य कीर्ति: । यूयं सर्वे गृहं गच्छत कैकेयीं च मा निन्दत” इति । 


भाषांतर - तेव्हा श्रीरामाबरोबर सीता व लक्ष्मण वनात जातात. तेव्हा प्रजाजन श्रीरामाला विनंती करतात, “श्रीरामा, वनात जाऊ नकोस”. तेव्हा श्रीराम लोकांना म्हणतात, “हे प्रजाजनहो, वडिलांची आज्ञा पाळणे माझे कर्तव्य आहे. मला युवराजपदाची पर्वा नाही. माझ्या वनात जाण्याने रघुवंशाची कीर्ती पसरो. तुम्ही सर्व घरी जा आणि कैकेयीची निंदा करू नका”.


४) श्रीराम: वनं गच्छति । तत्र रावण: सीतां अपहरति । 


भाषांतर - नंतर श्रीराम वनात जातात. तेथे रावण सीतेचे अपहरण करतो.

५) तत: क्रुद्ध: श्रीराम: वानराणां साहाय्येन रावणादीन् पराजयते, लङ्कां विजयते बिभीषणं भाषते च, “त्वं एव लङ्कां पालय । नाहं स्पृहये तव राज्याय” इति । 


भाषांतर - क्रुद्ध झालेले श्रीराम वानरांच्या सहाय्याने रावण वगैरेंचा पराभव करतात, लंका जिंकतात व बिभीषणाला म्हणतात, “तूच लंकेचा सांभाळ कर. मी तुझ्या राज्याची इच्छा करत नाही.”

 

६) तत: अयोध्यां श्रीराम: सीतया लक्ष्मणेन च सह प्रत्यागच्छति । अनन्तरं लोकानां समाधानार्थं विशुद्धाम् अपि सीतां वने विसृजति ।
भाषांतर - नंतर श्रीराम सीता व लक्ष्मणासह अयोध्येला परत येतात. नंतर लोकांच्या समाधानासाठी विशुद्ध असलेल्या सीतेचाही वनात त्याग करतात.


*७) एवमादिभि: त्यागपूर्णै: चरितै: परिपूर्ण:, भ्रातृवत्सल:, जननीप्रिय:, पितृभक्त:, मित्रप्रिय:, प्रजावत्सल:, प्रजातन्त्रस्य प्रेरक: श्रीराम: लोकानाम् आदर्शभूत: नृप: । 'यथा राजा तथा प्रजा' इति सर्वा: प्रजा: अपि स्वकर्तव्यपालनेन परस्परं प्रीणयन्ते स्म । अधुनापि वयं रामराज्यम् आदर्शराज्यमिति मन्यामहे । 


भाषांतर - अशाप्रकारे त्यागपूर्ण चरित्राने परिपूर्ण, भावांवर प्रेम करणारा, आईला प्रिय असणारा, पितृभक्त, मित्रांना प्रिय असणारा, प्रजेवर प्रेम करणारा, लोकशाहीचा प्रेरक श्रीराम हा लोकांचा आदर्श राजा आहे. 'जसा राजा तशी प्रजा' या (न्यायाने) सर्व प्रजा सुद्धा स्वकर्तव्याचे पालन करून परस्परांना आनंद देत असे. आजही आपण रामराज्य हे आदर्श राज्य होते असे मानतो.


प्रश्न १ - खालील प्रश्नांची संस्कृतमधे उत्तरे द्या.
१) श्रीरामस्य के भ्रातर: ?  
उत्तर - लक्ष्मण:, भरत: शत्रुघ्न: च श्रीरामस्य भ्रातर: ।

२) कैकेयी किं वरं वरयति ?

उत्तर - कैकेयी वरयति, ““मम पुत्र: भरत: युवराजपदं भूषयतु । श्रीराम: च वनं गच्छतु । एतान् वरान् मे प्रयच्छ” इति ।


३) दशरथ: कैकेयीं किं भणति ?
उत्तर - दशरथ: कैकेयीं भणति, ““अन्यत् किमपि वरय । श्रीरामेण विना नाहं जीवामि । अत: श्रीराम: वनं मा गच्छतु” इति ।

४) श्रीराम: केन सह वनं गच्छति ?
उत्तर - श्रीराम: सीतया लक्ष्मणेन सह च वनं गच्छति ।

५) श्रीराम: जनान् किं वदति ?
उत्तर - श्रीराम: जनान् वदति, “भो: जना:, जनकस्य आज्ञापालनं मम कर्तव्यम् । नाहं गणयानि युवराजपदम् । मम वनगमनेन प्रसरतु रघुवंशस्य कीर्ति: । यूयं सर्वे गृहं गच्छत कैकेयीं च मा निन्दत” इति ।

६) श्रीराम: बिभीषणं किं भाषते ?
उत्तर - श्रीराम: बिभीषणं भाषते, “त्वं एव लङ्कां पालय । नाहं स्पृहये तव राज्याय” इति ।

७) श्रीराम: कीदृश: अस्ति ?

उत्तर - श्रीराम: त्यागपूर्णै: चरितै: परिपूर्ण:, भ्रातृवत्सल:, जननीप्रिय:, पितृभक्त:, मित्रप्रिय:, प्रजावत्सल:, प्रजातन्त्रस्य प्रेरक: श्रीराम: लोकानाम् आदर्शभूत: नृप: अस्ति ।

===================================


 

" पाठ ५२ वा द्वितीया विभक्ती परस्मैपदी आज्ञार्थ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Thursday, September 3, 2020

आजचा स्वाध्याय - आत्मनेपदी धातूंची रूपे


आजचा स्वाध्याय - आत्मनेपदी धातूंची रूपे

आत्मनेपदी धातूंची खालीलप्रमाणे रूपे होतात.

गाहे  गाहावहे  गाहामहे  प्रथम पुरुष
गाहसे  गाहेथे  गाहध्वे   द्वितीय पुरुष
गाहते  गाहेते  गाहन्ते   तृतीय पुरुष

प्रथम गणातील आत्मनेपदी धातू

स्पर्ध् - स्पर्धते = स्पर्धा करणे , बाध् - बाधते = पीडा देणे, वन्द् - वन्दते = नमस्कार करणे, मुद्-मोद् - मोदते = आनंदणे, स्वद् - स्वदते = चव घेणे, कूर्द् - कूर्दते = उडी मारणे, स्वाद् - स्वादते = स्वाद घेणे, कत्थ् - कत्थते = वल्गना करणे, लोक् - लोकते = पहाणे, शङ्क् - शङ्कते = शंका घेणे, वेष्ट् - वेष्टते = गुंडाळणे, चेष्ट् - चेष्टते = प्रयत्न करणे, हिण्ड् - हिण्डते = फिरणे, वेप् - वेपते = थर थर कापणे, कम्प् - कम्पते = कापणे, थरथरणे, त्रप् - त्रपते = लाजणे, जृम्भ् - जृम्भते = जांभई देणे, क्षम् - क्षमते = क्षमा करणे, कम् - कामयतेइच्छा करणे, दय् - दयते = दया करणे, शिक्ष् - शिक्षते = शिकणे, भिक्ष् - भिक्षते = भिक्षा मागणे, ईक्ष् - ईक्षते = पहाणे, भाष् - भाषते = भाषण करणे, भास् - भासते = आभास होणे, ग्रस् - ग्रसते = ग्रासणे, ईह् - ईहते = इच्छा करणे, गर्ह् - गर्हते = निंदा करणे, प्र + काश् - प्रकाशते = प्रकाशणे अव + गाह् - अवगाहते = डुंबणे, बुडणे,  द्युत्-द्योत् - द्योतते चकाकणे, = रुच्- रोच् - रोचते = आवडणे, शुभ्-शोभ् - शोभते = शोभणे, स्रंस् - स्रंसते  = गळणे, वृत्-वर्त् - वर्तते = असणे, वृध्-वर्ध - वर्धते = वाढणे. डी-डय् = उडणे, परि + त्रै-त्राय् = रक्षण करणे, प्रथ् - प्रथते = प्रसिद्ध होणे

 
आत्मनेपदी धातू वापरून खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा. (प्रथमा विभक्ती)
 

१) दुर्जन पीडा देतो. २) मी नमस्कार करतो. ३) तुम्ही सर्व आनंदित होता. ४) अनुराधा चव घेते. ५) माखडे उड्या मारतात. ६) मधुरा पहाते. ७) मी शंका घेतो. ८) मुले प्रयत्न करतात. ९) मुलगा फिरतो. १०) अर्जुन थरथर काफतो. ११) पाने कंप पावतात. १२) तुम्ही दोघे जांभया देता. १३) परमेश्वर क्षमा करतो. १४) सज्जन दया करतात. १५) मी शिकतो


क्रियापदाचे योग्य ते वर्तमानकाळी रूप वापरा. 


१) याचका: ---- (भिक्ष्)
२) यूयम् ---- (ईक्ष्)
३) वयं ---- (भाष्)
४) सङ्कटानि ---- (ग्रस्)
५) अहम् --- (ईह्)
६) राहु: --- (ग्रसते)
७) दुर्जना: ---- (गर्ह्)
८) सूर्य: --- (प्र + काश्)
९) तारका: --- (द्युत्-द्योत्)
१०) पुष्पाणि ---- (शुभ्-शोभ्)
११) वयं ---- (वृत्-वर्त्)
१२) वृक्षा: ---- (वृध्-वर्ध्)
१३) खग: --- (डी-डय्)
१४) नृप: --- (परि + त्रै-त्राय्)
१५) काव्यानि --- (प्रथ्)
 

काल भाषांतरासाठी दिलेल्या वाक्यांची उत्तरे. काल कर्ता व क्रियापद यांचीच फक्त योजना करायची होती.   
 
प्रथमा विभक्ती - 


१) तू वाचतोस. (पठ्)
त्वं पठसि ।
२) रावण हरण करतो. (हृ-हर्)
रावण: हरति ।
३) गोपाळ पितो. (पा-पिब्)
गोपाल: पिबति ।
४) मुले खेळतात. (क्रीड्)
बालका: क्रीडन्ति ।
५) तुम्ही दोघे जाता. (गम्-गच्छ्)
युवां गच्छथ: ।
६) तुम्ही सर्व बोलता. (वद्)
यूयं वदथ ।
७) तो टाकतो. (त्यज्)
स: त्यजति ।
८) त्या दोघी खेळतात. (क्रीड्)
ते क्रीडत: ।
९) आम्ही दोघे धावतो. (धाव्)
आवां धावाव: ।
१०) ती जाणते. (बुध्-बोध्)
सा बोधति ।
११) तू उभा रहातोस. (स्था-तिष्ठ्)
त्वं तिष्ठसि ।
१२) राजा जिंकतो. (जि-जय्)
भूप: जयति ।
१३) पाने पडतात (पत्)
पर्णानि पतन्ति ।
१४) वानर खातो. (खाद्)
वानर: खादति ।
१५) आम्ही सर्व आहोत. (भू-भव्)
वयं भवाम: ।
१६) तू आठवतोस. (स्मृ-स्मर्)
त्वं स्मरसि ।
१७) तुम्ही दोघे बोलता. (भण्)
युवां भणथ: ।
१८) शेतकरी नांगरतो. (कृष्)
कृषीवल: कृषति ।
१९) त्या दोघी लिहीतात. (लिख्)
ते लिखत: ।
२०) ब्राह्मण पूजा करतात. (अर्च्)
ब्राह्मणा: अर्चन्ति ।

कंसातील धातूचे योग्य क्रियापद योजा, 


१) त्वं पश्यसि । (दृश्)
२) बालिके तिष्ठत: । (स्था-तिष्ठ्)
३) तानि गच्छन्ति । (गम्)
४) वयम् वदाम: । (वद्)
५) सेनापति: जयति । (जि-जय्)
६) युवां त्यजथ: । (त्यज्)
७) अहम् वसामि (वस्)
८) यूयं धावथ । (धाव्)
९) मार्जारा: पिबन्ति । (पा-पिब्)
१०) ता: स्मरन्ति । (स्मृ-स्मर्)
११) आवां खादाव: । (खाद्)
१२) पर्जन्य: भवति । (भू-भव्)
१३) त्वं बोधसि । (बुध्-बोध्)
१४) सा नयति । (नी-नय्)
१५) सङ्कटानि नश्यन्ति । (नश्)
१६) यूयं नन्दथ । (नन्द्)
१७) अजे चरत: । (चर्)
१८) मेघा: गर्जन्ति । (गर्ज्)
१९) वानरा: कूर्दन्ति । (कूर्द्)
२०) त्वम् अर्हसि । (अर्ह्)
================================== 

 द्वितीया विभक्ती -

संस्कृत वाक्यरचना करतांना कर्ता शब्द प्रथमा विभक्तीत योजतात तर कर्म शब्द द्वितीया विभक्तीत योजतात. उदा. 'मी लेख लिहीतो.' याचे भाषांतर 'अहं लेखं लिखामि' असे होईल. कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी प्रथमा विभक्तीत योजला आहे. त्याप्रमाणे क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी आहे. आणि लिखामि क्रियापदाचे लेख हे कर्म आहे. लेख हा शब्द पुंलिंगी आहे. त्यामुळे त्याची रूपे देव शब्दाप्रमाणे होतील. एकच लेख असेल तर 'लेखं' असे रूप येईल व अनेक लेख असतील तर 'लेखान्' असेही येईल.


मी अनेक लेख लिहीतो.
अहं लेखान् लिखामि ।

त्याप्रमाणे खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करायचे आहे. कोणताही शब्दाची विभक्ती योजतांना त्या शब्दाचे लिंग पण पहावे लागेल व त्याप्रमाणे त्या शाब्दाची प्रथमा अथवा द्वितीया विभक्ती योजावी लागेल. पर्जन्य: पतति । येथे पर्जन्य शब्द पुंलिंगी आहे व त्याची रूपे देव प्रमाणे होतील तर पर्णानि पतन्ति । येथे पर्ण शब्द नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे त्याची रूपे वन प्रमाणे होतील. सदस्यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


संस्कृतमधे भाषांतर करा.

१) कावळा फळे खातो. २) आम्ही पाणी पितो. ३)  ते दोघे चित्रपट पहातात. ४) आई तुला आठवते (आठवण काढते). ५) लोक केर (अवकर) टाकतात. ६) मुलगी सोने इच्छिते. ७) दास पुस्तके नेतात. ८) राजा शत्रूला जिंकतो. ९) तुम्ही दोघे विहीर (कूप) पहाता. १०) हरिणे गवत (तृण) खातात. ११) तुम्ही सर्व ज्ञान मिळवता (अधि + गम्) १२) विद्यार्थी कविता म्हणतात (पठ्) १३) अनेक शिक्षक ज्ञान देतात. १४) लेखक कथा लिहीतो. १५) रुग्ण वैद्याला बोलावतो. १६) आई चित्र दाखवते (दिश्) १७) तुम्ही सर्व देव पूजता. १८) शेतकरी जमीन खणतात. (खन्) १९) गायक गीते गातात. २०) याचक धन मागतात. (याच्)

=================================

उत्तरे प्रथमा विभक्ती कर्ता व क्रियापद आत्मनेपदी धातू

आत्मनेपदी धातू वापरून खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा. (प्रथमा विभक्ती)
 
१) दुर्जन पीडा देतो.
दुर्जन: बाधते (पीडयति)।
२) मी नमस्कार करतो.
अहं वन्दे ।
३) तुम्ही सर्व आनंदित होता.
यूयं मोदध्वे ।
४) अनुराधा चव घेते.
अनुराधा स्वदते ।
५) माकडे उड्या मारतात.
मर्कटा: कूर्दन्ते ।
६) मधुरा पहाते.
मधुरा ईक्षते ।
७) मी शंका घेतो.
अहं शङ्के ।
८) मुले प्रयत्न करतात.
बालका: यतन्ते ।
९) मुलगा फिरतो.
बालक: हिण्डते ।
१०) अर्जुन थरथर कापतो.
अर्जुन: वेपते ।
११) पाने कंप पावतात.
पर्णानि कम्पन्ते ।
१२) तुम्ही दोघे जांभया देता.
युवां जृम्भेथे ।
१३) परमेश्वर क्षमा करतो.
परमेश्वर: क्षमते ।
१४) सज्जन दया करतात.
सज्जना: दयन्ते ।
१५) मी शिकतो
अहं शिक्षे ।

क्रियापदाचे योग्य ते वर्तमानकाळी रूप वापरा. 


१) याचका: भिक्षन्ते । (भिक्ष्)
२) यूयम् ईक्षध्वे । (ईक्ष्)
३) वयं भाषामहे । (भाष्)
४) सङ्कटानि ग्रसन्ते । (ग्रस्)
५) अहम् ईहे । (ईह्)
६) राहु: ग्रसते (ग्रस्)
७) दुर्जना: गर्हन्ते । (गर्ह्)
८) सूर्य: प्रकाशते । (प्र + काश्)
९) तारका: द्योतन्ते । (द्युत्-द्योत्)
१०) पुष्पाणि शोभन्ते । (शुभ्-शोभ्)
११) वयं वर्तामहे । (वृत्-वर्त्)
१२) वृक्षा: वर्धन्ते । (वृध्-वर्ध्)
१३) खग: डयन्ते । (डी-डय्)
१४) नृप: परित्रायते । (परि + त्रै-त्राय्)
१५) काव्यानि प्रथन्ते । (प्रथ्) 

=====================================

 

 

 


Tuesday, September 1, 2020

सामासिक शब्द म्हणजे समास होऊन बनलेला जोडशब्द.

सामासिक शब्द म्हणजे समास होऊन बनलेला जोडशब्द.

उदा. देवमंदिरम्

देवस्य मंदिरम्

देवाचे मंदिर ते देवमंदिर. देव व मंदिर दोन शब्द एकत्र करून नवा शब्द तयार करणे म्हणजे समास.

समासांचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत.

हे कोठल्या पाठावरील आहे ? 

उत्तर - सर्वनामांचे अर्थ कसे होतात असा एका ग्रुपवर प्रश्न विचारला होता. त्याचे हे उत्तर आहे. 

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...